‘त्या’ गाण्यातून काय मेसेज? पत्रकाराचा सवाल; एअर मार्शल यांचं खणखणीत उत्तर, टाळ्यांचा कडकडाट.

पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूरनंतर सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तिन्ही दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईची माहिती पुराव्यांसह माध्यमांना देण्यात आली.नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूरनंतर सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तिन्ही दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईची माहिती पुराव्यांसह माध्यमांना देण्यात आली. याचना नही, अब रण होगा या रामधारी सिंह दिनकर यांच्या गाण्यानं तिन्ही दलाच्या संयुक्त पत्रकार परिषदेला सुरुवात झाली. या गाण्यातून तु्म्ही नेमका काय इशारा देऊ पाहताय, असा प्रश्न एका पत्रकारानं एअर ऑपरेशन्सचे डीजी ए. के. भारती यांना विचारला. त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
आमचा लढा दहशतवाद्यांविरोधात आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून हेच सांगत आहोत. आम्ही ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत हवाई केले. त्यावेळी आम्ही केवळ दहशतवादी तळ आणि त्यांच्या संघटनांच्या मुख्यालयांना लक्ष्य केलं, याकडे एअर मार्शल यांनी लक्ष वेधलं. ‘आम्ही पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ले केले नव्हते.

लष्कराच्या तळांना आमच्याकडून लक्ष्य करण्यात आलेलं नव्हतं. आमच्या रडारवर दहशतवादी तळ होते. पण पाकिस्तानी सैन्यानं दहशतवाद्यांची साथ दिली. त्यांनी आमच्या सैन्य तळांवर हल्ल्याचे प्रयत्न केले. त्यामुळे आम्ही त्यांना प्रत्युत्तर दिलं. त्यात त्यांचं बरंच नुकसान झालं. त्याला ते स्वत: जबाबदार आहेत,’ असं ए. के. भारती म्हणाले.आमचा लढा पाकिस्तानच्या लष्कराशी नाही. आमचा लढा तिथल्या दहशवाद्यांशी आहे. त्यांच्या लष्करानं दहशतवाद्यांची मदत केली. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सैन्य प्रत्युत्तर देणार याची आम्हाला पूर्ण कल्पना होती. त्यामुळेच हवाई सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आली होती. आमच्या सुरक्षा यंत्रणेनं शत्रूचे ड्रोन्स, क्वॉडकॉप्टर्स पाडले. क्षेपणास्त्रं हवेतच नष्ट केली, अशी माहिती भारती यांनी दिली. पाकिस्तानी सैन्यानं आमच्या तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्यानं प्रत्युत्तरादाखल आम्हीही त्यांच्या हवाई तळांवर हल्ले केले. त्यात त्यांचं नुकसान झालं, अशी माहिती देत भारती यांनी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहिम यार खान हवाई तळाचा व्हिडीओ दाखवला.पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी ‘याचना नही, अब रण होगा’ हे गाणं वाजवण्यात आलं. तो धागा पकडून एका पत्रकारानं त्या गाणातून तुम्ही नेमका काय संदेश देत आहात, असा प्रश्न विचारला. त्यावर भारती यांनी रामचरितमानसमधील एक पंक्ती उद्धृत केली. “विनय न मानत जलधि जड़, गए तीनि दिन बीति। बोले राम सकोप तब भय बिनु होइ न प्रीति”, अशा शब्दांत भारती यांनी शत्रू राष्ट्राला सूचक इशारा दिला. समझदार को इशारा ही काफी है, असं ते पुढे म्हणाले.प्रभू श्रीरामांना सीतामाईंच्या सुटकेसाठी समुद्र ओलांडून जायचं होतं. त्यावेळी वानरसेवेला वाट मिळावी यासाठी त्यांनी समु्द्राकडे विनंती केली. पण तीन दिवस उलटूनही काहीच सकारात्मक घडलं नाही. त्यावेळची परिस्थिती वर्णन करणाऱ्या या पंक्ती आहेत. ‘इकडे तीन दिवस उलटले. पण समुद्राला विनयाची भाषा समजत नाही. तेव्हा प्रभू श्रीराम संतापाच्या भरात म्हणाले, रागाशिवाय प्रीति होत नाही.’

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.