पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूरनंतर सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तिन्ही दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईची माहिती पुराव्यांसह माध्यमांना देण्यात आली.नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूरनंतर सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तिन्ही दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईची माहिती पुराव्यांसह माध्यमांना देण्यात आली. याचना नही, अब रण होगा या रामधारी सिंह दिनकर यांच्या गाण्यानं तिन्ही दलाच्या संयुक्त पत्रकार परिषदेला सुरुवात झाली. या गाण्यातून तु्म्ही नेमका काय इशारा देऊ पाहताय, असा प्रश्न एका पत्रकारानं एअर ऑपरेशन्सचे डीजी ए. के. भारती यांना विचारला. त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
आमचा लढा दहशतवाद्यांविरोधात आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून हेच सांगत आहोत. आम्ही ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत हवाई केले. त्यावेळी आम्ही केवळ दहशतवादी तळ आणि त्यांच्या संघटनांच्या मुख्यालयांना लक्ष्य केलं, याकडे एअर मार्शल यांनी लक्ष वेधलं. ‘आम्ही पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ले केले नव्हते.










