पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. जनरल मुनीर यांच्या एका वक्तव्यामुळे ते टीकेचे धनी ठरले आहेत. त्यांच्या ‘द्विराष्ट्र सिद्धांता’च्या उल्लेखावर पाकिस्तानी नागरिक नाराज आहेत. माजी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांच्या काळात शांतता होती, असं बोललं जात आहे. मुनीर यांच्या विधानामुळे भारत-पाकिस्तानमध्ये अशांती पसरल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात टीका होत आहे.इस्लामाबाद: पाकिस्तानातील परिस्थिती सध्या गंभीर आहे. भारताकडून सतत तीन दिवस झालेल्या मानहानीमुळे पाकिस्तानी नागरिक आता लष्करप्रमुख जनरल मुनीर यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. ‘मुल्ला जनरल’ म्हणून ओळखले जाणारे पाकिस्तानचे आर्मी चीफ आसिम मुनीर यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे ते टीकेचे लक्ष्य ठरत आहेत. एप्रिल महिन्यात त्यांनी हिंदू आणि मुस्लिम हे दोन वेगळे असल्याचं विधान केलं होतं. त्यामुळेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक बिघडले, असा आरोप त्यांच्यावर होत आहे.
मुनीर यांनी आग भडकावली पाकिस्तानचे प्राध्यापक डॉ. इश्तियाक अहमद यांनी जनरल मुनीर यांच्यावर थेट आरोप केले आहेत. जनरल बाजवा (माजी पाकिस्तानी सेना प्रमुख) यांच्या काळात शांतता होती. पण आसिम मुनीर यांनी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये काहीच साम्य नाही, असं बोलून आग भडकावली, असं ते म्हणाले.










