हिंदू-मुस्लिम करुन मूर्खपणा! भारताकडून पाकची दाणादाण, आर्मी चीफवर भडकले पाकिस्तानी प्रोफेसर.

पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. जनरल मुनीर यांच्या एका वक्तव्यामुळे ते टीकेचे धनी ठरले आहेत. त्यांच्या ‘द्विराष्ट्र सिद्धांता’च्या उल्लेखावर पाकिस्तानी नागरिक नाराज आहेत. माजी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांच्या काळात शांतता होती, असं बोललं जात आहे. मुनीर यांच्या विधानामुळे भारत-पाकिस्तानमध्ये अशांती पसरल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात टीका होत आहे.इस्लामाबाद: पाकिस्तानातील परिस्थिती सध्या गंभीर आहे. भारताकडून सतत तीन दिवस झालेल्या मानहानीमुळे पाकिस्तानी नागरिक आता लष्करप्रमुख जनरल मुनीर यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. ‘मुल्ला जनरल’ म्हणून ओळखले जाणारे पाकिस्तानचे आर्मी चीफ आसिम मुनीर यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे ते टीकेचे लक्ष्य ठरत आहेत. एप्रिल महिन्यात त्यांनी हिंदू आणि मुस्लिम हे दोन वेगळे असल्याचं विधान केलं होतं. त्यामुळेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक बिघडले, असा आरोप त्यांच्यावर होत आहे.
मुनीर यांनी आग भडकावली पाकिस्तानचे प्राध्यापक डॉ. इश्तियाक अहमद यांनी जनरल मुनीर यांच्यावर थेट आरोप केले आहेत. जनरल बाजवा (माजी पाकिस्तानी सेना प्रमुख) यांच्या काळात शांतता होती. पण आसिम मुनीर यांनी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये काहीच साम्य नाही, असं बोलून आग भडकावली, असं ते म्हणाले.

भारतात मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोकसंख्या राहते, याचं भानही त्यांना राहिलं नाही, असंही ते म्हणाले. मुनीर यांचं विधान अत्यंत बेजबाबदार असल्याचं त्यांनी सांगितलं. पाकिस्तानात २० लाखांपेक्षा जास्त हिंदू राहतात, ते पाकिस्तानचे नागरिक नाहीत का?, असा सवालही त्यांनी विचारला. जनरल लोकांना असे भडकाऊ आणि बेजबाबदार विधानं करण्याचा सल्ला कोण देतं, हेच मला कळत नाही, असंही ते म्हणाले.पाकिस्तानचे तज्ञ मोईद पीरजादा यांनीही डॉ. इश्तियाक अहमद यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. मुनीर यांच्या मूर्खपणाच्या विधानामुळे पाकिस्तानी आर्मीवर इस्लामिक सेना असल्याचा शिक्का बसला आहे, असं पीरजादा म्हणाले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) आपले मत व्यक्त केले. “मी सहमत आहे! आसिम मुनीर यांची टिप्पणी पूर्णपणे मूर्खपणाची आणि अनुचित होती. यामुळे गैरसमज निर्माण झाले आहेत आणि त्यांच्या वैयक्तिक भावनांसाठी संपूर्ण पाकिस्तानी सैन्याला दोषी ठरवले जात आहे,” असं त्यांनी लिहिलं.पाकिस्तानने 13 ते 16 एप्रिल दरम्यान इस्लामाबादमध्ये प्रवासी पाकिस्तानी संमेलनाचे आयोजन केले होते. या संमेलनात बोलताना जनरल मुनीर यांनी ‘द्विराष्ट्र सिद्धांता’चा उल्लेख केला होता. हिंदू आणि मुस्लिम यांना एकमेकांपेक्षा वेगळे असल्याचा उल्लेख केला. याच कार्यक्रमात त्यांनी काश्मीर पाकिस्तानचे अविभाज्य अंग असल्यासंबंधी टिप्पणी केली होती.मुनीर म्हणाले होते, “पाकिस्तानची कहाणी आपल्या मुलांना नक्की सांगा, जेणेकरून ते ती विसरणार नाहीत. आपल्या पूर्वजांचा असा विश्वास होता की आपण हिंदूंपेक्षा प्रत्येक बाबतीत वेगळे आहोत. आपला धर्म, रूढी, परंपरा, विचार आणि ध्येय सर्व काही वेगळे आहे. हाच द्विराष्ट्र सिद्धांताचा आधार आहे. आपण एक नाही, दोन राष्ट्र आहोत.” काश्मीरला पाकिस्तानपासून कोणीही वेगळे करू शकत नाही, असंही ते म्हणाले होते.मुनीर यांच्या या विधानाच्या एका आठवड्यानंतर जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. यात 26 लोक मारले गेले होते, ज्यात 25 पर्यटक होते. दहशतवाद्यांनी निशस्त्र पर्यटकांना मारण्यापूर्वी त्यांचा धर्म विचारला होता. या हल्ल्यामागे जनरल मुनीर यांच्या विधानानेच प्रेरणा दिली, असं मानलं जातं.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.