तर पाकिस्तानने प्रत्युत्तर दिल्यास भारताचा प्लॅन काय? भारतीय सुरक्षा दल सज्ज, कशी आहे तयारी.

भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानवर कारवाई केल्यानंतर, संभाव्य प्रतिक्रियेच्या पार्श्वभूमीवर भारताने सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली आहे. जमीन, आकाश आणि समुद्रात सुरक्षा वाढवण्यात आली असून, नौदल आणि हवाई दलाला सतर्क ठेवण्यात आलं आहे. पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यास, त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सुरक्षा दल सज्ज आहेत.भारताने ७ मे रोजी पाकिस्तानवर ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवल्यानंतर आता पाकिस्तानने या हल्ल्याचं उत्तर देण्याचं म्हटलं आहे. पाकिस्तानकडून प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता लक्षात घेता, भारताने जमीन, आकाश आणि समुद्री सुरक्षा व्यवस्था मजबूत केली आहे. अरबी समुद्रात अनेक आघाडीच्या युद्धनौका तैनात करण्यात आल्या आहेत. सीमेवरील जवान कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांकडून हवाई गस्त ठेवली जात आहे. यादरम्यान, देशाच्या अण्वस्त्र शस्त्रागाराची जबाबदारी असलेल्या तीनही सैन्याला खबरदारीचा उपाय म्हणून हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, हेलिकॉप्टर पायलट विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी भारताने आपल्या प्रत्युत्तरात खूप संयम दाखवला आहे, असं म्हटलं. मात्र आता पाकिस्तानने प्रत्युत्तर दिल्यास सुरक्षा व्यवस्था मजबूत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

भारताने केलेल्या एअरस्ट्राइकनंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर केल्यास त्याला उत्तर देण्यासाठी भारतीय सुरक्षा दल पूर्णपणे तयार आहे. पाकिस्तानकडून असं कोणतंही धाडस झालं, तर परिस्थिती आणखी बिकट होईल. लष्करी-राजनयिक वर्तुळात अशी भावना आहे की पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याकडे त्यांच्या अशांत झालेल्या देशातील सर्वांना त्यांच्या बाजूने वळवण्यासाठी लष्करी प्रत्युत्तरात्मक हल्ला करण्याशिवाय पर्याय नाही.पुलवामा दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून २६ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये हवाई हल्ले केले होते. त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात पुलवामा येथील ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. मात्र आता याबाबत बोलताना अधिकाऱ्याने सांगितलं की धडा शिकलो आहे. यावेळी ते इतकं सोपं नसेल. सशस्त्र दल गेल्या १५ दिवसांपासून तयारी करत आहेत आणि ते कुठेही कमी पडू देणार नाहीत.

त्यांनी हे देखील मान्य केलं की भारतासारखा मोठा देश आपलं हवाई क्षेत्र पूर्णपणे अभेद्य बनवू शकत नाही.२०१९ मध्ये बालाकोट हल्ल्यानंतर सशस्त्र दलांनी अनेक नवीन शस्त्र समाविष्ट केली आहेत. यात रशियन S-400 उंची क्षेपणास्त्र प्रणाली, जी ३८० किलोमीटर अंतरापर्यंत शत्रूची क्षेपणास्त्रं, लढाऊ विमानं आणि ड्रोन शोधू शकतं आणि ती नष्ट करू शकतं.स्पेक्ट्रमच्या दुसऱ्या टोकाला जुनी इग्ला-१ एम हवाई संरक्षण प्रणाली आणि खांद्यावर चालणारी नवी इग्ला-एस क्षेपणास्त्रं आहेत, ज्यांची क्षमता ६ किमी पर्यंत आहे. यामध्ये इस्रायल-निर्मित बराक-८ मध्यम-श्रेणीची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली (७० किमी अंतरापर्यंत), स्वदेशी बनावटीची आकाश हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली (२५ किमी) आणि इस्रायली कमी-श्रेणीची स्पायडर क्विक रिअ‍ॅक्शन अँटी-एअरक्राफ्ट क्षेपणास्त्र (१५ किमी) यांचा समावेश आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.