या निवडणुकीत काँग्रेसचे नेते एकत्र राहिल्यास भाजपला बहुमत मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल, असे मानले जात आहे.रे भाजपचे महापालिकेच्या १५१ पैकी १२१ जागांचे टार्गेट ठेवले आहे. त्यांच्या या लक्ष्याने महायुतीतील मित्रपक्षांवर स्वबळाची वेळ येऊ शकते आणि काँग्रेस महाआघाडीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गृहनगरात भाजपचे टार्गेट नेत्यांना सुखावणारे आणि कार्यकर्त्यांचा कस लावणारे असल्याचे मानले जात आहे. २०१७ साली भाजपचे १०८ नगरसेवक निवडून आले. त्या आधारे आताची परिस्थिती लक्षात घेऊन टार्गेट वाढवले. अर्थात २०२२ साली निवडणुका झाल्या असत्या तरी, १२० चे उद्दिष्ट होते. मात्र, त्यावेळी परिस्थिती त्यांना अनुकूल नव्हती. एकतर महाविकास आघाडीची सत्ता आणि दुसरीकडे सेना व राष्ट्रवादी एकसंघ होती. त्यातही अनेक नगरसेवकांवर सर्वसामान्यांची नाराजीचा सूर असल्याची अशी चर्चा होती. गेल्यावेळी काँग्रेसची गटबाजी शिगेला पोहोचली होती.










