फडणवीस-गडकरींच्या बालेकिल्ल्यात भाजपने कंबर कसली; महापालिकेच्या १५१ पैकी १२१ जागांचे टार्गेट.

 या निवडणुकीत काँग्रेसचे नेते एकत्र राहिल्यास भाजपला बहुमत मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल, असे मानले जात आहे.रे भाजपचे महापालिकेच्या १५१ पैकी १२१ जागांचे टार्गेट ठेवले आहे. त्यांच्या या लक्ष्याने महायुतीतील मित्रपक्षांवर स्वबळाची वेळ येऊ शकते आणि काँग्रेस महाआघाडीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गृहनगरात भाजपचे टार्गेट नेत्यांना सुखावणारे आणि कार्यकर्त्यांचा कस लावणारे असल्याचे मानले जात आहे. २०१७ साली भाजपचे १०८ नगरसेवक निवडून आले. त्या आधारे आताची परिस्थिती लक्षात घेऊन टार्गेट वाढवले. अर्थात २०२२ साली निवडणुका झाल्या असत्या तरी, १२० चे उद्दिष्ट होते. मात्र, त्यावेळी परिस्थिती त्यांना अनुकूल नव्हती. एकतर महाविकास आघाडीची सत्ता आणि दुसरीकडे सेना व राष्ट्रवादी एकसंघ होती. त्यातही अनेक नगरसेवकांवर सर्वसामान्यांची नाराजीचा सूर असल्याची अशी चर्चा होती. गेल्यावेळी काँग्रेसची गटबाजी शिगेला पोहोचली होती.

पाडापाडीच्या राजकरणात त्यांना २९ जागांवर समाधान मानाावे लागले. त्याचा फायदा भाजपला झाला. राष्ट्रवादी आणि शिवसेना एकसंघ असले तरी त्यांचेही बळ पुरले नव्हते. दुनेश्वर पेठे विजयी झाल्याने राष्ट्रवादी मुक्त महापालिका होण्याची नामुष्की टळली.शिवसेनेनेही दोन जागांवर विजय मिळवत अस्तित्व टिकवले. तीन वर्षात राजकीय स्थिती व समीकरण बदलले. गेल्यावेळी सर्व पक्ष स्वबळावर लढले होते. काँग्रेसमधील गटबाजी बऱ्यापैकी संपुष्टात आली आहे. २०१९ व २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत नेत्यांनी आपआपल्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचे नेते एकत्र राहिल्यास भाजपला बहुमत मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल, असे मानले जात आहे.भाजपने १२१ चे टार्गेट पूर्ण करण्यासाठी काही निकष ठरवण्याचे संकेत दिले आहेत. कोण किती सक्रिय होते, संघटनेतील काम, जनतेची कामे सोडवण्यात कुणाला किती यश आले, याचे मुल्यमापन करून याचा आधार घेतला जाणार आहे. यापूर्वीही म्हणजे २०२२ साली ७० टक्के नवीन चेहरे देण्याचे पक्षाचे प्रयत्न होते. गेल्यावेळी भाजपच्या उमेदवारीसाठी तीन हजाराहून अधिक इच्छुकांनी दावा केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अंतिम यादी तयार करताना दमछाक झाली. यानंतर महालातील गडकरी वाड्यावर मध्यरात्री असंतोषाचा भडका उडाला होता. मात्र, गडकरी यांना केलेल्या डॅमेज कंट्रोलचा निवडणुकीत लाभ झाला, हे विशेष.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.