राफेलची ‘लिंबू-मिरची’ कधी काढणार? काँग्रेस नेते अजय राय यांच्या टिप्पणीनंतर वाद.

राय यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मात्र, वाद निर्माण झाल्यानंतरही राय त्यांच्या विधानांवर ठाम राहिले.जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाची स्थिती असताना, उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये राय यांच्या हातात राफेल विमानाची प्रतिकृती असून, त्याला प्रतिकात्मक ‘लिंबू-मिरची’ लटकवण्यात आली आहे. लढाऊ विमानावरून ‘लिंबू-मिरची’ कधी काढली जाईल, अशी विचारणा राय यांनी केंद्र सरकारला केली आहे. या व्हिडिओवरून वाद निर्माण झाला.राय यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मात्र, वाद निर्माण झाल्यानंतरही राय त्यांच्या विधानांवर ठाम राहिले. ‘मी देशाला सत्य दाखवून दिले. संरक्षणमंत्री राजनाथसिंह राफेल घेण्यासाठी गेले, तेव्हा त्यांनी त्यावर लिंबू आणि मिरची बांधली होती. मी केवळ हे लिंबू आणि मिरची कधी काढणार आणि राफेल कधी काम करणार? दहशतवाद्यांवर कारवाई कधी करणार, एवढीच विचारणा केली आहे,’ असे ते म्हणाले.

‘पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानला योग्य उत्तर देण्यासाठी केंद्र सरकार राफेल विमानातून लिंबू-मिरची कधी काढून टाकणार? संपूर्ण भारत पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची वाट पाहत आहे; परंतु केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही,’ असे राय रविवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. ‘पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांचे कुटुंबीय अजूनही सरकार यावर काही गंभीर कारवाई करील याची वाट पाहत आहेत; परंतु दुर्दैवाने, सरकार या गंभीर मुद्द्यांवर पूर्ण अपयशी ठरत आहे.’राय यांच्या विधानावर भाष्य करताना, फैजाबाद येथील समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद म्हणाले, ‘मी (राय यांचे) विधान ऐकले नाही; परंतु मला वाटते, की संपूर्ण विरोधी पक्ष पहिल्या दिवसापासूनच या भ्याड दहशतवादी हल्ल्यासाठी देशाच्या शत्रूंना योग्य उत्तर देण्याची मागणी करीत आहे. मला वाटते, की या संदर्भात आमच्या दृष्टिकोनात कोणताही बदल झालेला नाही.भाजपचे राज्यसभा सदस्य अमरपाल मौर्य यांनी सोमवारी राय यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘काँग्रेसने नेहमीच सुरक्षा दलांचा अपमान केला आहे आणि त्यांच्या क्षमतेवर शंका घेतली आहे. राय यांचे विधान त्याचे आणखी एक उदाहरण आहे. तथापि, मी असे म्हणू इच्छितो, की काँग्रेस पक्ष आणि सर्व देशद्रोहींना योग्य उत्तर दिले जाईल,’ असे ते म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षेबाबत सरकारच्या भूमिकेवर भर देताना ते म्हणाले, ‘देशाच्या शत्रूंविरुद्ध हल्ल्यांचे स्वरूप आणि वेळ ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आमच्या सरकारने सुरक्षा दलांना दिले आहे. या टप्प्यावर जेव्हा सर्वांनी शत्रूचा सामना करण्यासाठी एकत्र यायला हवे, तेव्हा काही लोक स्वतःला खालच्या पातळीचे राजकारण करण्यापासून रोखू शकत नाहीत, हे दुर्दैवी आहे.’

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.