आई, वडिलांना मुलाचे सतत फोन, प्रतिसाद मिळेना; शेजाऱ्यांना घरी पाठवलं अन् धक्कादायक घटना समोर.

मुलगा गेल्या दोन दिवसांपासून गावी राहणाऱ्या आई वडिलांना फोन करत होता पण प्रतिसाद मिळत नसेल्याने अखेर त्याने शेजाऱ्यांना घरी पाठवले. तेथे जाताच धक्कादायक घटना समोर आली.चैन्नई: गावात शेतातील एका घरात राहणाऱ्या दोन वयोवृद्ध दांम्पत्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. 75 वर्षीय रामासामी हे आपल्या पत्नी बक्कियाम्मल यांच्यासोबत राहत होते.तमिळनाडूच्या इरोडमध्ये हे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शिवगिरीच्या जवळ वेलंगट्टू वलासु गावात हे दांम्पत्य राहत होते.रामासामी यांच्या मुलगा हा मुथुर येथे राहत होता. गेल्या दोन दिवसांपासून आई वडिलांशी संपर्क होत नसल्याने काळजीत होता. तो त्यांना वारंवार फोन करत होता. दरम्यान त्याने तेथे राहत असलेल्या शेजाऱ्यांशी संपर्क साधला आणि आई वडीलांबद्दल माहिती मिळवण्यास सांगितले.

त्यांनंतर शेजारी ज्यावेळी त्यांच्या घरी गेले त्यावेळी रामासामी आणि त्यांची पत्नी दोघांचे मृतदेह पाहून धक्का बसला.रामासामी घरात आढळले तर त्यांच्या पत्नी बक्कियाम्मल यांचा मृतदेह घराच्या बाहेर आढळला.जिल्हा पोलिसांना या घटनेबद्दल माहिती मिळताच घटनास्थळी पोहचली. दोन्हीं मृतदेहांना पोस्टमार्टम रिपोर्टसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. जिल्हा एसपी सुजाता यांनी सांगितले की, एडीएसपीच्या नेतृत्वात आठ विशेष पथक बनवण्यात आली आहेत. जी सध्या घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज काढत आहे. सध्या दाम्पत्यांचे 8 तोळ्याचे सोन्याचे दागिने सापडत नसल्याचे प्रथमदर्शनी तपास कळले आहे. आम्ही अजून काही पुरावे शोधत आहोत.विरोधी पक्षातील नेते पलानीसामी यांनी तामिळनाडू सरकारला लक्ष्य करत दावा केला आहे की, शासन व्यवस्था पुर्णपणे बिघडली आहे. काही वर्षात अशा अनेक हत्या झाल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधारी पक्ष डीएमकेला या हत्या अत्यंत क्षुल्लक असल्याचे वाटत आहे मात्र त्यांना याबद्दल खरंच लाज वाटली पाहिजे असे ते म्हणाले.काही दिवसांपूर्वीच अशीच एक घटना उत्तरप्रदेशात घडली होती. उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये भरदिवसा चाकू मारुन वृद्ध दांम्पतांच्यी हत्या करण्यात आली होती. सरकारी अधिकारी अरुण कुमार यांनी जागीच प्राण सोडला. तर त्यांच्या पत्नी यांना गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला. पोलिसांकडून कॉल डिटेल्स चेक करण्यात येत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.