फायटर जेट विमानातून ४५३ किलो वजनाचा बॉम्ब पडला, नगरमध्ये खळबळ, एक किमीचा परिसर रिकामा केला अन्…

मागील मार्च महिन्यात राहुरी तालुक्यातील वरवंडी परिसरातील बांबू प्रकल्पात आकाशातून जाणाऱ्या एका जेट विमानातून एक जिवंत बॉम्ब पडला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हादरा बसला होता. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे २४ मार्च रोजी दुपारच्या सुमारास एका फायटर जेट विमानातून एक जिवंत बॉम्ब पडला होता. एक महिन्यानंतर पुणे येथील भारतीय सैन्य दलाच्या बीडीएस (बॉम्ब डिस्पोज स्कॉड) पथकाने घटनास्थळी येऊन त्या बॉम्बचा फ्युज काढून तो निकामी केल्याने मोठा अनर्थ टळला.सदर बॉम्ब गुरुवारी घटना स्थळावरून नेण्यात आला. केके रेंज येथे नेऊन बॉम्बचा विस्फोट केला जाणार असल्याची माहिती सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी दिली.मागील मार्च महिन्यात राहुरी तालुक्यातील वरवंडी परिसरातील बांबू प्रकल्पात आकाशातून जाणाऱ्या एका जेट विमानातून एक जिवंत बॉम्ब पडला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हादरा बसला होता. सदर बॉम्ब पडल्यापासुन वरवंडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तब्बल एक महिना होऊन त्या बेवारस बॉम्बची दखल घेतली गेली नव्हती.

परिसरातील नागरीकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी दिल्ली येथे संरक्षण विभागाला हि माहिती कळविली होती.काल (१ मे) पुणे येथील भारतीय थल सेनेचे नायक सुभेदार काश कोटगी, हवालदार प्रमोद हनमंताचे, हवालदार टी कन्नन, हवालदार बी. एन. राव हे बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने जेसीबीच्या सहाय्याने सात फूट खड्ड्यातील जिवंत बॉम्ब बाहेर काढला. त्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी सहकार्य केले. यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. नायक सुभेदार कोटगी यांनी केके रेंजच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घटनास्थळी बॉम्ब पाहण्यासाठी गर्दी होऊ नये, यासाठी पोलीस व कृषी विद्यापीठाचे सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. व जवळपास एक किलोमीटरचा परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता.

बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने बॉम्बचे मोजमाप केले. सदर बॉम्ब साडेचार फूट लांब, चार फूट व्यास, ४५३ किलो वजनाचा आहे. बॉम्बची पिन निघाली नाही, त्यामुळे बॉम्ब फुटला नाही. अन्यथा एक किलोमीटर परिघातील क्षेत्र उध्वस्त झाले असते. तीन ते चार किलोमीटर पर्यंत भूकंप सदृश हादरे बसले असते. मोठी जीवित व वित्तहानी झाली असती. अशी माहिती सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.जेट फायटर विमानातून जिवंत बॉम्ब पडल्यानंतर एकच खळबळ उडाली असून विविध चर्चांना उधाण आले आहे. विमानातून बॉम्ब खाली पडलास कसा असा प्रश्न अनेकांना पडला असून त्याची वरिष्ठ स्तरावर चौकशी व्हावी अशी देखील अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. सदर बॉम्ब ब्लास्ट झाला असता तर मोठी जीवित हानी वित्तहानी झाली असती. मात्र सुदैवाने बॉम्ब ब्लास्ट झालं नाही. त्यामुळे विमानातून बॉम्ब पडलास कसा? अशी चर्चा सर्वत्र होत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.