पाकिस्तानने त्यांची राजधानी वाचवण्यासाठी पावले उचलली असून लाहोर ते इस्लामाबाद या क्षेत्रात विमानांना उड्डाणबंदी घालण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आता पाकिस्तानची सर्व बाजूने कोंडी करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामध्ये सर्वप्रथम सिंधू पाणी वाटप करार (Indus Water Treaty) रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर आता भारतीय नेव्हीची ताकद असलेल्या आयएनएस विक्रांत (INS Vikrant) या महाबलाढ्य युद्धनौकेला अरबी समुद्रात उरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जर युद्ध झालंच तर भारत पाकिस्तानला जाणाऱ्या तेलाची अडवणूक करु शकतो आणि पाकिस्तानला ते जड जाण्याची शक्यता असल्याचं मत लेफ्टनंट जनरल मोहन भंडारी यांनी व्यक्त केलं. एका यूट्यूब वाहिनीला मुलाखत देताना लेफ्टनंट जनरल मोहन भंडारी म्हणाले की, “सध्या पाकिस्तानची अवस्था ही बिकट झाली आहे. त्यांच्या लष्करामध्ये दोन गट पडल्याचं चित्र आहे. अशा परिस्थितीत जर पाकिस्तानने युद्धाची घोषणा केली तर ते जास्तीत जास्त सात ते आठ दिवस तग धरू शकतात. दुसऱ्या बाजूनने त्यांना तालिबाननेही आव्हान दिलं आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान युद्ध करू शकत नाही.”










