गोळी न झाडता भारताने घेतला पहिला बदला; पाकिस्तान पुरता अडकणार; एक स्ट्राइक अन् 70000 कोटी​ पाण्यात.

 पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे, ज्यामुळे पाकिस्तानची संघर्षशील अर्थव्यवस्था आणखी संकटात सापडली आहे. सिंधू जल करार स्थगित करणे आणि द्विपक्षीय व्यापार थांबवणे यासारख्या भारताच्या कठोर उपाययोजनांमुळे पाकिस्तानच्या शेअर बाजाराला मोठा तोटा झाला.मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. 26 निष्पाप पर्यटकांचा बळी घेणाऱ्या भयानक दहशतवादी हल्ल्यांवर कठोर भूमिका घेत भारत सरकारने अनेक ॲक्शन घेतले ज्यामुळे पाकिस्तानला, विशेषतः अडचणीत असलेल्या अर्थव्यवस्थेला फटका बसणार आहे. पाकिस्तान शेअर बाजार धडाम पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भारताची भीती स्पष्टपणे दिसून येत होती. या हल्ल्यानंतर भारत सरकारने अलीकडेच घेतलेल्या निर्णयांचा परिणाम पाकिस्तानच्या शेअर बाजारात दिसून आला आणि सुमारे एका आठवड्यात KSE100 मध्ये 4.50 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. यासह भारताने गोळी न चालवताच पाकिस्तानचे 70 हजार कोटी बुडवून बदला घेतला.

भारताने केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानच्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली, ज्यामुळे पाकिस्तानच्या बाजाराला सुमारे 70,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले. या काळात कराची स्टॉक एक्सचेंज 4.50% हून अधिक आपटला असून मंगळवारीही, KSE100 मध्ये 1100 पेक्षा जास्त अंकांची घसरण दिसून आली. या उलट, भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली असून 22 तारखेनंतर सेन्सेक्समध्ये सुमारे 1,100 अंकांची वाढ झाली आहे.पाकिस्तानच्या शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदवली गेली. या काळात बाजाराचा मुख्य निर्देशांक, कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये दुपारी 100 अंकांनी घसरण होऊन 114,007.40 अंकांवर व्यवहार सुरू होता. विशेष म्हणजे ट्रेडिंग सत्रादरम्यान KSE100 निर्देशांक 1,130.78 अंकांनी घसरून 112,935.57 अंकांवर घसरला होता.त्याचवेळी, एक दिवसाआधी देखील KSE100 मध्ये पडझड नोंदवली गेली. एक वेळी, केएसई वाढीसह व्यवहार करत होता पण, दिवसाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर कराची स्टॉक एक्सचेंज एक टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाला. भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे पाकिस्तानच्या शेअर बाजारात घसरण दिसून येत असल्याचं तज्ज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे 22 एप्रिलनंतर पाकिस्तानी शेअर बाजारात 5 पैकी 4 ट्रेडिंग सत्रांमध्ये घसरण दिसून आली आहे.पहलगाम हल्ल्यानंतर गेल्या एका आठवड्यात किंवा त्याहूनही अधिक काळ पाकिस्तानच्या बाजाराचे मोठे नुकसान झाले आहे. 22 एप्रिल रोजी कराची स्टॉक एक्सचेंजचे मार्केट कॅप $52.84 अब्ज होते तर, 29 एप्रिल रोजी केएसई 100 च्या खालच्या पातळीपर्यंत पोहोचल्यानंतर 50.39 अब्ज डॉलर्सवर आले. म्हणजे या काळात पाकिस्तानच्या शेअर बाजाराला 2.45 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले, जे पाकिस्तानी रुपयांमध्ये सुमारे 70 हजार कोटी रुपये आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.