अहो हा आपला आल्हाद नाहीये! परदेशात लेकराचा मृत्यू, आई-वडील रोज रडायचे, महिनाभराने पार्थिव घरी, मात्र बॉडी भलत्याची.

अह्लाद नंदन महतो यांचे आई-वडील त्याच्या मृतदेहाची वाट पाहत होते. मृतदेह इराणमधून भारतात येणार होता. पण जेव्हा तो घरी पोहोचला, तेव्हा तो दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचे समोर आले.भारतीय तरुणाचे निधन होऊन जवळपास महिना उलटला. झारखंडमध्ये राहणारे तरुणाचे कुटुंबीय शोकसागरात बुडाले होते. अशातच परदेशातून मुलाचं पार्थिव निघाल्याची बातमी त्यांना समजली, मात्र लेकाच्या निधनाच्या धक्क्यातून सावरत असतानाच नियतीने त्यांची पुन्हा थट्टा केली. कारण घरी आलेला मृतदेह त्यांच्या मुलाचा नव्हता. एका महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आलेला मृतदेह दुसऱ्याच व्यक्तीचा निघाल्याने कुटुंबाचा संताप झाला. झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील मनोहरपूरमध्ये ही घटना घडली.अह्लाद नंदन महतो यांचे आई-वडील त्याच्या मृतदेहाची वाट पाहत होते. मृतदेह इराणमधून भारतात येणार होता. पण जेव्हा तो घरी पोहोचला, तेव्हा तो दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचे समोर आले.मनोहरपूरमधील वृद्ध आई-वडील आपल्या मुलाच्या पार्थिवाची वाट पाहत होते. त्यांचा मुलगा अह्लाद नंदन महतो याचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह इराणहून भारतात येणार होता. यासाठी एक महिन्यांचा कालावधी लागला. जेव्हा तो मृतदेह घरी पोहोचला आणि त्याचे ताबूत उघडले, तेव्हा कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

कारण त्यामध्ये असलेला मृतदेह अह्लाद यांचा नसून दुसऱ्याच व्यक्तीचा होता. मनोहरपूरला पोहोचलेला मृतदेह उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील शिवेंद्र प्रताप सिंह यांचा होता.या घटनेमुळे प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कुटुंबीयांचा आरोप आहे की, “एवढ्या मोठ्या प्रतीक्षेनंतर आणि सरकारी प्रक्रिया पार पाडल्यानंतरही शव बदलणे ही केवळ चूक नाही, तर अमानवीय क्रूरता आहे.” या घटनेमुळे भारतातील सरकारी यंत्रणेचा बुरखा फाटला आहे. गरिबांना मदतीच्या नावाखाली फक्त त्यांची थट्टा केली जात आहे, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मनोहरपूर तालुक्यातील तरतरा गावचे अह्लाद नंदन महतो गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नोकरीसाठी इराणला गेले होते. 28 मार्च रोजी त्यांच्या कुटुंबीयांना बातमी मिळाली की, एका जहाज अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. यानंतर घरात दु:खाचे वातावरण पसरले आणि कुटुंबीयांनी अह्लाद यांचा मृतदेह परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.कुटुंबीयांनी भारतीय दूतावासाने सांगितलेली प्रत्येक कागदपत्रे पूर्ण केली. त्यांनी सर्व ठिकाणी मदतीसाठी अर्ज केले. पण जेव्हा मृतदेह आला, तेव्हा तो अह्लाद यांचा नसून उत्तर प्रदेशमधील शिवेंद्र प्रताप सिंह यांचा निघाला.अह्लाद यांचे भाऊ रघुनंदन महतो यांनी सांगितले की, “कोलकाता विमानतळावर त्यांना शव पाहू दिले नाही.

त्यांना एक सीलबंद ताबूत देण्यात आले आणि फक्त सही घेतली.” विमानतळ प्राधिकरण आणि दूतावासाचे काम फक्त कागदपत्रांवर सही घेणे आहे का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. “शवाची ओळख पटवणे, कुटुंबीयांचे समाधान करणे, या गोष्टी आता सरकारी यंत्रणेच्या प्राधान्यक्रमामधून बाहेर पडल्या आहेत का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.अह्लाद महतो यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शवाबरोबर जो प्रकार झाला, तो देशाच्या सरकारी यंत्रणेवर अनेक प्रश्न उभे करतो. “भारतीय दूतावासाची जबाबदारी फक्त कागदपत्रे भरणे आहे का?” आणि “विदेश मंत्रालय कोणत्या तोंडाने ‘प्रवासी भारतीयांच्या सुरक्षे’चा दावा करते?” असा सवाल कुटुंबीयांनी विचारला आहे. “हा आमच्या दुःखासोबत क्रूर विनोद आहे,” असेही ते म्हणाले.रघु नंदन महतो म्हणाले की, “आम्ही एक महिन्यापासून भावाच्या शवाची वाट पाहत होतो. दररोज रडत होतो. आता जेव्हा शव आले, तेव्हा ते पण दुसऱ्याचे आहे. हा आमच्या भावनांसोबत क्रूर विनोद आहे. एवढी मोठी चूक कशी होऊ शकते? सरकार आणि दूतावासाला यावर उत्तर द्यावे लागेल.”आता हे शव शिवेंद्र यांच्या कुटुंबीयांना सोपवले जाणार आहे. मनोहरपूरला पोहोचलेले हे शव चक्रधरपूर रेल्वे रुग्णालयाच्या शीतगृहात ठेवण्यात आले आहे. हे शव आता मृतक शिवेंद्र यांच्या कुटुंबीयांना सोपवले जाईल. पण प्रश्न अजूनही कायम आहेत. अह्लाद नंदन महतो यांचे शव कुठे आहे?, असा सवाल कुटुंबीय विचारत आहेत. “इराणच्या जहाजाच्या अपघातात मारले गेलेले अह्लाद नंदन महतो यांचे शव शोधण्यासाठी आणि ते मनोहरपूरला पाठवण्यासाठी भारतीय दूतावास काही ठोस पाऊल उचलणार आहे का? आणि या घटनेला जबाबदार कोण आहे? त्यांच्यावर काय कारवाई होणार?” असे प्रश्न विचारले जात आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.