पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, नवीन सीएनजी बस वारंवार बंद, PMP प्रशासनाचा मोठा निर्णय; प्रवाशांचे हाल.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील नवीन सीएनजी बस वारंवार बंद पडत आहेत. यामुळे पीएमपी प्रशासनाने काही बस दुरुस्तीसाठी पाठवल्या होत्या. आतापर्यंत १२३ बस दाखल झाल्या, पण त्यामध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. कंपनीच्या तज्ञांकडून दुरुस्ती केल्यानंतर, दहा बस पुन्हा ताफ्यात दाखल झाल्या आहेत. ‘पीएमपी’ त्यांची चाचणी घेत आहे.पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या सीएनजी बस बंद पडू लागल्यामुळे संचलनातून काही काळ बंद केल्या आहेत. बसच्या तांत्रिक समस्यांचा आढावा कंपनीच्या तज्ज्ञांकडून घेण्यात आला. त्यानंतर आता दहा बसमध्ये आवश्यक दुरुस्त्या आणि उपाययोजना करून त्या पुन्हा पीएमपीच्या ताफ्यात दाखल करण्यात आल्या आहेत. या बसची ‘पीएमपी’ कडून चाचणी घेण्यात आहे. त्यानंतर सर्व बस मार्गावर सोडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे; पण यात प्रवाशांना हाल सहन करावे लागत आहेत.
पीएमपी‘कडून भाडेतत्त्वावरील ४०० सीएनजी बसची खरेदी प्रक्रिया पूर्ण केली होती. त्या बस दाखल होण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत १२३ पर्यंत बस ताफ्यात दाखल झाल्या होत्या; पण दाखल झालेल्या बसचे इंजिन गरम होऊन त्या रस्त्यात बंद पडू लागल्या होत्या.

तिरुपती, वैष्णवो आणि बालाजी या ठेकेदारांच्या माध्यमातून या बस पुरविण्यात आल्या आहेत. बसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांचा समावेश असल्याचा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात या मार्गांवर बसचे ब्रेकडाउन होत आहे.बसचा पिक-अप कमी असल्याने वाहतूक कोंडीच्या ठिकाणी त्या अडकून पडत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने नव्याने दाखल झालेल्या १२३ बस तात्पुरत्या स्वरूपात संचलनातून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी दहा बसची कंपनीकडून तांत्रिक चाचणी करण्यात आली. आता या दहा बस पुन्हा चाचणीसाठी ‘पीएमपी’च्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. त्यांची चाचणी यशस्वी झाल्यानंतर पुढील बसबाबत निर्णय घेतला जाणार आहे.नव्याने दाखल झालेल्या १२३ बस बंद ठेवण्यात आल्या आहेत.

यातील २४ बस कंपनीने देखभाल दुरुस्तीसाठी ताब्यात घेतल्या आहेत. त्यातील दहा बसवर आवश्यक उपाययोजना करून त्या परत प्रशासनाकडे दिल्या आहेत. उर्वरित ९९ बसचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे; तसेच एप्रिल अखेरपर्यंत येणाच्या ४०० बस कधी येणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच बस कमी असल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असताना नवीन बस येण्यासही उशीर लागत आहे. त्यामुळे या सर्वांना जबाबदार कोण आणि त्यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.६६ ठेकेदारांकडून बंद दुरुस्तीसाठी कंपनीकडे पाठविल्या आहेत. यातील १० बस तांत्रिक बिघाड दुरुस्त करून परत पाठविल्या आहेत. या बसची आता चाचणी घेण्यात येत आहे. त्यानंतर मार्गावर बस सोडण्यात येतील, अशी माहिती पीएमपी, सहव्यवस्थापकीय संचालक, नितीन नार्वेकर यांनी दिली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.