‘तुम्ही दोघेही मंत्रीपदावर आहात, तुमच्यातच वाद होत असतील तर….’ वडेट्टीवारांचा राणे-कदमांना टोला.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाला गोंधळलेली सरकार म्हणत योगेश कदम आणि नितेश राणे यांच्यावर घणाघात केला आहे. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याच्या मतदारसंघात जाऊन कायदा सुव्यवस्था आणि हिंदुत्व सांगतो असे ते म्हणाले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री योगेश कदम आणि मंत्री नितेश राणे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. सत्ताधारी पक्षाला गोंधळलेली सरकार म्हणत योगेश कदम आणि नितेश राणे यांच्यावर घणाघात केला आहे. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याच्या मतदारसंघात जाऊन कायदा सुव्यवस्था आणि हिंदुत्व सांगतो असे ते म्हणाले. वडेट्टीवारांनी “स्थानिक मंत्री आम्हाला कायदा व्यवस्था शिकवू नका. शांतता कशी राखायची आम्हाला ठाऊक” या गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या वक्तव्याकडे अंगुली निर्देश केला.

नितेश राणे आणि योगेश कदमांना “तुम्ही दोघेही मंत्रीपदावर आहात.अशा कारणांवरून वाद होत असेल तर हे किती गोंधळलेलं सरकार आहे हे दिसतंय” असा टोला देखील लगावला. ते पुढे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री म्हणतात पाकिस्तानचा एकही नागरिक महाराष्ट्रात नाही. दुसरीकडे नगर विकास खात्याचे मंत्रिमंडळ म्हणते की, 107 पाकिस्तानी सापडत नाही. यामध्ये इतका समन्वयाचा अभाव सरकारमध्ये कसा असू शकतो? सरकारमध्ये विसंवाद आहे आणि हे सरकार गोंधळलेले आहे हे स्पष्ट झालं आहे’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.यावेळी बोलताना त्यांनी नरहरी झिरवळांवरही निशाणा साधला.

ते म्हणाले की, ‘नरहरी झिरवळ सध्या मंत्री झालेत त्यामुळे त्यांनी जरा प्रत्येक गोष्ट पाहून आणि वाचून बोलली पाहिजे. पंधराशे रुपयात महिला खुश आहेत का ते जिल्हा परिषद पालिका निवडणुकीत दिसेलच. महागाई वाढवून लोड सुरू केली दुसरीकडे 2100 रुपये देणार हे त्यांच्या जाहीरनाम्यात आहे. अशा भूमिका मांडून सरकारच्या नियतीत खोट आहे हे स्पष्ट होत आहे” असे ते म्हणाले’ महाराष्ट्रात भ्रष्टाचाराला ऊत आला आहे. कमिशन खोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. खालच्या स्तरापासून लोकांनी पैसे दिल्याशिवाय एकही काम प्रशासनातील अधिकारी करत नाही. ज्या विभागाला कामं दिली जातात तिथेसुद्धा कमिशन दिल्याशिवाय कामांकरिता निधी वितरित केला जात नाही. हा भ्रष्टाचार संपवायचा असेल तर त्याची सुरुवात मंत्रालयातून करावी लागेल’ असे वडेट्टीवार म्हणाले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.