विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाला गोंधळलेली सरकार म्हणत योगेश कदम आणि नितेश राणे यांच्यावर घणाघात केला आहे. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याच्या मतदारसंघात जाऊन कायदा सुव्यवस्था आणि हिंदुत्व सांगतो असे ते म्हणाले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री योगेश कदम आणि मंत्री नितेश राणे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. सत्ताधारी पक्षाला गोंधळलेली सरकार म्हणत योगेश कदम आणि नितेश राणे यांच्यावर घणाघात केला आहे. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याच्या मतदारसंघात जाऊन कायदा सुव्यवस्था आणि हिंदुत्व सांगतो असे ते म्हणाले. वडेट्टीवारांनी “स्थानिक मंत्री आम्हाला कायदा व्यवस्था शिकवू नका. शांतता कशी राखायची आम्हाला ठाऊक” या गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या वक्तव्याकडे अंगुली निर्देश केला.
नितेश राणे आणि योगेश कदमांना “तुम्ही दोघेही मंत्रीपदावर आहात.अशा कारणांवरून वाद होत असेल तर हे किती गोंधळलेलं सरकार आहे हे दिसतंय” असा टोला देखील लगावला. ते पुढे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री म्हणतात पाकिस्तानचा एकही नागरिक महाराष्ट्रात नाही. दुसरीकडे नगर विकास खात्याचे मंत्रिमंडळ म्हणते की, 107 पाकिस्तानी सापडत नाही. यामध्ये इतका समन्वयाचा अभाव सरकारमध्ये कसा असू शकतो? सरकारमध्ये विसंवाद आहे आणि हे सरकार गोंधळलेले आहे हे स्पष्ट झालं आहे’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.यावेळी बोलताना त्यांनी नरहरी झिरवळांवरही निशाणा साधला.









