भारतीय जवान 5 दिवसांपासून पाकिस्तानच्या ताब्यात, कधी होणार सुटका.

 पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. त्याचदरम्यान एका भारतीय जवानाने चुकून सीमा पार केली. गेले 5 दिवसापासून तो पाकिस्तानातच आहे.नवी दिल्ली: पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच दरम्यान पंजाबमधील फिरोजपूरमध्ये एक घटना घडली आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर BSF चा एक जवान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेला. या जवानाचे नाव पी.के. साहू आहे. ते 23 एप्रिल रोजी सीमेपलीकडे गेले. आज 5 दिवस झाले, तरी ते परत आलेले नाहीत.बीएसएफ जवान पी.के. साहूला परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बीएसएफचे अधिकारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पण त्यांना अजून यश मिळालेले नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते साव यांच्या सुरक्षेची आणि जेवणाची काळजी घेत आहेत.पी.के. साव अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात आहेत.

पाकिस्तानी रेंजर्स आणि बीएसएफ अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली होती. त्या बैठकीत पाकिस्तानी रेंजर्स म्हणाले होते की, ते बीएसएफ जवानाला कधी आणि कसे सोडायचे, हे BSF ला लवकरच कळवतील. पण अजूनपर्यंत त्यांनी काहीही माहिती दिलेली नाही. (BSF म्हणजे ही भारताची सीमा सुरक्षा दल आहे. या दलाचे काम भारताच्या सीमांचे रक्षण करणे आहे.)अधिकाऱ्यांनी सांगितले, “जर एखादा जवान चुकून सीमा ओलांडून दुसऱ्या बाजूला गेला, तर त्याच्याशी वाईट वागणूक केली जात नाही.

तरीही, आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत की, पाकच्या ताब्यात असलेल्या आमच्या जवानाला कोणतीही इजा होऊ नये.”या घटनेनंतर बीएसएफने आपल्या जवानांना अलर्ट केले आहे. त्यांनी जवानांना सांगितले आहे की, त्यांनी कोणतीही चूक करू नये. अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आता परिस्थिती पूर्वीसारखी नाही राहिली आहे. त्यामुळे सीमेवर तैनात असलेल्या जवानांनी खूप सावधगिरी बाळगायला हवी.” हे आदेश फक्त पंजाबमध्येच नाही, तर जम्मू-काश्मीर सीमेवर तैनात असलेल्या BSF जवानांनाही देण्यात आले आहेत.पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सेना अर्लट मोडवर आहे. रिपोर्टनुसार पाकिस्तानने सीमेकडील गावे खाली केली आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.