पंढरपूर मंदिरात फक्त हिंदूच विश्वस्त असू शकतात यावर आम्ही सहमत आहोत. पण जर मालमत्तेचा वाद असेल तर, वक्फमध्ये हिंदू कसे असू शकतात? जर जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असतील तर ते सरकारच्या वतीने निर्णय देतील. वक्फसाठी सर्वांनी एकत्र यावे.परभणीच्या ईदगाह मैदानावर वक्फ कायद्याविरुद्ध ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने आयोजित केलेल्या बैठकीत एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी काश्मीरमधील हल्ल्याचा निषेध केला. “पाकिस्तानने काश्मीरवर अनेक वेळा हल्ले केले आहेत. यामध्ये अनेक निष्पाप लोकांचा बळी जात आहे. पठाणकोट, वैष्णोदेवी अशा अनेक घटना मी पाहिल्या. दहशतवादी महिला आणि मुलांना वेगळे करतात आणि त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर त्यांना गोळ्या घालतात. तिथे उपस्थित असलेले मौलवी तुम्हाला सांगतील की इस्लाममध्ये निष्पाप लोकांना मारणे किती मोठा गुन्हा आहे” असे ओवैसी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणे आवश्यक आहे. पाकिस्तान पन्नास वर्षे मागे आहे. तो आपल्याशी स्पर्धा करू शकत नाही. भारतातील लोकांवर हल्ला करायला कोणता धर्म सांगतो? पाकिस्तान अनेक वर्षांपासून दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे. मी हे सर्वपक्षीय बैठकीत सांगितले होते. असेही ते म्हणाले.ओवैसी पुढे म्हणाले की मी मोदीजींना सांगतो, तुम्हाला वक्फ विधेयक मागे घ्यावे लागेल. मी संसदेत म्हटले होते की, हा काळा कायदा आहे. पंतप्रधान मोदींनी स्वतःच्या फायद्यासाठी हा कायदा आणला. फडणवीस ती मालमत्ता परत करतील का? आमची मालमत्ता हिसकावून घेण्यासाठी हा कायदा आणला गेला आहे. वक्फची मालमत्ता अल्लाहची आहे. भाजप म्हणते की या विधेयकामुळे गरीब मुस्लिमांना फायदा होईल. तुम्ही आमची मशीद हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहात. जर आपण आज निषेध केला नाही तर सर्व जमिनी काढून घेतल्या जातील.









