हीच का उबाठाची देशभक्ती? सर्वपक्षीय बैठकीस अनुपस्थितीवरुन उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात यांना राजकारण दिसते. काहीतरी जनाची नाही तर मनाची तरी ठेवली पाहिजे. मला शिव्या देण्यात आणि आरोप करण्यातच त्यांनी धन्यता मानली आहे, अशी टीकाही शिंदे यांनी केली. ‘देशाच्या सुरक्षेसाठी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सर्व पक्ष गेले; पण उबाठा गेले नाही. हेच का यांचे देशप्रेम, हीच का देशभक्ती,’ असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी येथे केला. ‘पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात यांना राजकारण दिसते. काहीतरी जनाची नाही तर मनाची तरी ठेवली पाहिजे. मला शिव्या देण्यात आणि आरोप करण्यातच त्यांनी धन्यता मानली आहे,’ अशी टीकाही शिंदे यांनी केली.शिंदे म्हणाले, ‘कार्यकर्ते हीच शिवसेनेची संपत्ती आणि ऐश्वर्य आहे. आज लाडक्या बहिणी आणि भावांना भेटायला आलो आहे. निवडणुकीवेळी भगवा फडकवा; मी तुमचे आभार मानायला येईन, हा शब्द मी पाळला असून, महाराष्ट्रभर फिरतोय. स्वागत करून मला आशीर्वाद दिले जात आहेत. एवढ्या कडाक्याच्या उन्हात तुम्ही आलात, भर उन्हाळ्यात प्रेमाचा पाऊस पाडला आहे. हे प्रेम सर्वांच्या नशिबी नसते. मुख्यमंत्री होतो तेव्हा कार्यकर्ता म्हणून काम केले.

आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करत आहे. तुम्ही राजकीय तापमान वाढविले आणि विरोधकांना जोरदार चटके बसले. त्यांना कायमचे गप्पगार केले. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत टीम म्हणून काम केले. आजदेखील टीम म्हणूनच काम करतोय. सर्वसामान्यांचे सरकार बनविले.’शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार सभा रविवारी बुलढाणा येथे पार पडली. या वेळी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय राठोड, आमदार संजय गायकवाड आदी उपस्थित होते.शिंदे पुढे म्हणाले, ‘जो उठाव केला तो करण्याची हिंमत, धाडस एकनाथ शिंदेनेच केले. शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचे काम ज्यांनी केले, ती शिवसेना मी वाचविली.विरोधकांनी म्हटले, ‘न्यायालयाने, निवडणूक आयोगाने विरोधात निकाल दिला. आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ…’ मात्र जनता आमच्या सोबत राहिली.

मग शिवसेना कुणाची? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि सर्वसामान्यांना न्याय देणारी शिवसेना कुणाची? हे जनतेनेच दाखवून दिले.’‘देशातील १४० कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे. सर्वांच्या मनात राग, संताप आहे. मोदी यांनी कारवाई सुरू केली आहे. या कामात शिवसैनिक पाठीशी राहणार आहे. ही देशभक्तीची लढाई आहे. शिवसैनिक जवानासारखा काम करील. आता ही आरपारची लढाई आहे. पाकिस्तानचे कंबरडे कायमचे मोडले जाईल आणि पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला शेवटचा ठरेल अशी कारवाई पंतप्रधान मोदी करतील,’ असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.आमदार संजय गायकवाडांना समज पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समज द्यावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. बुलढाण्यातील सभेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संजय गायकवाड यांना वर्दीचा आदर राखण्याचा सल्ला दिला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.