५३७ पाकिस्तानी मायदेशी; नऊ राजनैतिक अधिकाऱ्यांचा समावेश, अल्पमुदतीच्या व्हिसाधारकांची मुदत संपली.

पहलगाम येथे २२ एप्रिलला दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतात वास्तव्य असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे.गेल्या चार दिवसांत ५३७ पाकिस्तानी नागरिकांना अटारी-वाघा सीमेवरून भारताबाहेर पाठवण्यात आले आहे. यामध्ये नऊ राजनैतिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पहलगाम येथे २२ एप्रिलला दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतात वास्तव्य असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे.रविवारी २३७ पाकिस्तानी नागरिक अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानात परत गेले. शनिवारी ८१, शुक्रवारी १९१, तर गुरुवारी २८ पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात आले. त्याच वेळी ११६ भारतीय रविवारी मायदेशी परतले. शुक्रवारी ३४२ भारतीय परतले होते. यात १३ राजनैतिक अधिकाऱ्यांचा समावेश होता. गुरुवारी २८७, तर बुधवारी १०५ भारतीय नागरिक पाकिस्तानातून मायदेशी परतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. २४ ते २७ एप्रिलदरम्यान ५३७ पाकिस्तानी नागरिकांना भारताबाहेर पाठवण्यात आले, तर ८५० भारतीय पाकिस्तानातून मायदेशी परतले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, बारा प्रकारच्या अल्पमुदतीच्या व्हिसाधारकांची मुदत संपल्यानंतर रविवारी उशिरापर्यंत आणखी काही पाकिस्तानी नागरिक भारतातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

अनेक पाकिस्तानी नागरिक हवाई मार्गानेही जात आहेत. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये थेट हवाई सेवा नसल्याने अन्य देशांत हे नागरिक भारतातून जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.’पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना निश्चितच न्याय मिळेल आणि दहशतवादी व त्यांच्या सूत्रधारांना कठोरातील कठोर शिक्षा होईल’, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिली. ‘प्रत्येक भारतीयाचे रक्त उसळत आहे’, असेही त्यांनी नमूद केले. ‘दहशतवादी आणि त्यांच्या सूत्रधारांना काश्मीरला पुन्हा उद्ध्वस्त करायचे आहे. त्यामुळेच त्यांनी मोठे कटकारस्थान करून हा हल्ला केला’, असे ते म्हणाले.’पाकिस्तानचा एकही नागरिक राज्यात राहणार नाही. एकही पाकिस्तानी नागरिक गायब किंवा हरविलेला नाही. सोमवारी सायंकाळपर्यंत सर्व पाकिस्तानी नागरिक परत पाठविले जातील,’ असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केला. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे. राज्यात पाच हजारांहून अधिक पाकिस्तानी नागरिक असून, त्यापैकी शंभरहून अधिक नागरिक सापडत नसल्याची चर्चा आहे.

या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता, फडणवीस यांनी हे वृत्त फेटाळून लावले. ‘अनधिकृत फलक उभारणीवर नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे. फ्लेक्स लावायचा असेल, तर अधिकृत होर्डिंगवर जाहिरात केली पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकत्यांनी अनधिकृत फ्लेक्स लावले असतील, तर त्यावर कारवाई करावी, अशी सूचना मी राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना केली आहे. शहर विद्रूप होऊ नये, यासाठी कडक कायदे करावे लागतील,’ असे ते म्हणाले.पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आपल्या हाती घेतला आहे. पुराव्यांचा शोध घेण्यात येत असून प्रत्यक्षदर्शीची चौकशीही सुरू केली आहे. बुधवारपासूनच एनआयएचे पथक घटनास्थळी तळ ठोकून आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार दहशतवादविरोधी संस्थेने रविवारी जम्मूमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या तपासामध्ये अनेक पथकांचा समावेश आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.