भारताविरुद्ध युद्धाची शक्यता, पाकिस्तानची घाबरगुंडी; पंतप्रधानांकडून महत्त्वाचा प्रस्ताव.भारताविरुद्ध युद्धाची शक्यता, पाकिस्तानची घाबरगुंडी; पंतप्रधानांकडून महत्त्वाचा प्रस्ताव

22 एप्रिलला पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. त्यांनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. दोन्ही देशात युद्धाची शक्यता वर्तवली जात आहे. अशा स्थितीत पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे. त्यांनी एक प्रस्ताव दिला आहे.पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. युद्धाची शक्यता वर्तवली जात आहे. अशा स्थितीत पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे. त्यांनी एक प्रस्ताव दिला आहे. पाकिस्तानने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्याची तयारी दर्शवली आहे.पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले, “पाकिस्तान पहलगाम हल्ल्याची ‘तटस्थ’ चौकशी करण्यास तयार आहे.” पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 26 भारतीय पर्यटक मारले गेले. या घटनेमुळे पाकिस्तानवर जगभरातून टीका होत आहे.

काकुलमध्ये पाकिस्तान मिलिटरी अकादमीच्या पासिंग-आऊट परेडमध्ये बोलताना शहबाज शरीफ म्हणाले, “पहलगामची घटना म्हणजे एकमेकांवर आरोप करण्याची खेळी आहे. हे आता थांबायला हवे. एक जबाबदार देश म्हणून पाकिस्तान या प्रकरणाच्या कोणत्याही ‘तटस्थ’, ‘पारदर्शक’ आणि ‘विश्वसनीय’ चौकशीत सहभागी होण्यास तयार आहे.”शहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या लष्कराचा जुनाच राग आळवला आहे. त्यांनी काश्मीरला पाकिस्तानच्या ‘गळ्याची नस’ म्हटले आहे. ते म्हणाले, “काश्मीर पाकिस्तानच्या गळ्यातील नस आहे.” पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या हल्ल्यात 26 लोक मारले गेले. यात बहुतेक पर्यटक होते. 2000 नंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. ही संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहे.या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक बिघडलेआहेत. भारताने सिंधू जल करार (IWT) स्थगित केला आहे.

पाकिस्तानने शिमला करार आणि भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद करून प्रत्युत्तर दिले. भारताने हल्लेखोरांचे संबंध सीमेपलीकडील असल्याचे म्हटले आहे. तर, पाकिस्तानने यात आपला सहभाग नसल्याचे सांगितले आहे.पठाणकोट हल्ल्याच्या वेळीही पाकिस्तानने असेच बोलणे केले होते. भारताने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि पाकिस्तानी पथकाला चौकशीसाठी भारतात येऊ दिले. त्यावेळी भारत सरकारवर बरीच टीका झाली. पण, भारताने डिप्लोमसीला संधी दिली होती. पाकिस्तानची ‘ज्वाइंट इन्वेस्टिगेशन टीम’ (JIT) मार्च 2016 मध्ये भारतात आली होती. शहबाज शरीफ यांचा हा प्रस्ताव 2016 मधील ‘पठाणकोट’ सारखा तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. पठाणकोट एअरबेसवर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानचे पथक भारतात आले होते. पण, ती फक्त एक दिखाऊ खेळी ठरली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.