राज ठाकरेंच्या सादेला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिल्यानंतर मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याची जोरदार चर्चा राज्यभर सुरू झाली. ठाकरे गटाने एक पोस्ट करत पुन्हा एकत्र येण्याच्या विषयाला हात घातला आहे. शिवसेना ठाकरे गटाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.महाराष्ट्राच्या राजकारण बदलवून टाकणारी एक मोठी युती भविष्यात होऊ शकते. या युतीचे संकेत दोन्ही ठाकरे बंधुंनीच काही दिवसांपूर्वी दिले होते. राज ठाकरे यांनी अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्यासोबतची भांडण फार किरकोळ आहेत महाराष्ट्र मोठा आहे असे विधान केले आणि त्याला तात्काळ प्रतिसाद देत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी किरकोळ वाद बाजूला ठेवण्यास मी असल्याचे सांगितले. त्यानंतर मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याची जोरदार चर्चा राज्यभर सुरू झाली.
सध्या दोन्हीही ठाकरे बंधु सध्या परदेशात असल्याने या चर्चेला नेमके कधी मूर्त स्वरुप प्राप्त होईल हे कळू शकले नाही आहे.मनसे शिवसेना युती होते की ही केवळ चर्चा राहते हे लवकरच कळेल. दरम्यान ठाकरे गटाने एक पोस्ट करत पुन्हा एकत्र येण्याच्या विषयाला हात घातला आहे. शिवसेना ठाकरे गटाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये मुंबई महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे. अशा स्वरुपाचा आशय लिहिला आहे.वेळ आलीयं, एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे,मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी!या पोस्टद्वारे शिवसेना ठाकरे गटाने राज ठाकरे यांना पुन्हा साद घातली असल्याची चर्चा आहे.या पोस्टवर कमेंटचा पाऊस पडला असून लवकर एकत्र या, एकत्र या लवकर मग कशी मज्जा येते विरोधकांची ते बघायला संपूर्ण महाराष्ट्र आतुर आहे.









