मी सरकारमध्ये कुणाला फोन करत नाही, मदत मागायचीच तर… कोण आहेत निलेश राणेंचे खास मित्र.

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार असलेले निलेश राणे यांनी बोलताना जाहीरपणे सांगितलं की मी सरकारमध्ये कधीच कोणालाही फोन लावत नाही.कोकणातील राजकारणात एकेकाळी निलेश राणे यांनी मंत्री उदय सामंत यांचा समाचार घेतानाही मागेपुढे पाहिले नव्हते. पण राजकारणात कधीही कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कायमचा मित्रही नसतो, याच उक्तीप्रमाणे निलेश राणे आणि उदय सामंत यांच्यात मैत्री फुलताना दिसते. ही बाब पुन्हा एकदा निलेश राणे यांनीच अधोरेखित केली आहे. स्पष्टवक्ते व आक्रमक नेतृत्व अशी ओळख असलेल्या निलेश राणे यांच्या राजकारणातील दिलखुलास व खिलाडूवृत्तीचे दर्शन पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या आभार मेळाव्यातील भाषणातून पाहायला मिळाले.कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार असलेले निलेश राणे यांनी बोलताना जाहीरपणे सांगितलं की मी सरकारमध्ये कधीच कोणालाही फोन लावत नाही. मला अन्य कोणाकडे जायची वेळच येत नाही. फोन लावलाच तर फक्त उदय सामंत याच एका माणसाला लावतो. काही मदत लागली तर याच माणसाला विचारतो.

कधी कोणाकडे जात नाही, तशी गरजच पडली नाही, असं थेट जाहीरपणे सांगत निलेश राणे व उदय सामंत यांच्यातील ‘ही दोस्ती आता तुटायची नाय’ असेच स्पष्ट संकेत निलेश राणे यांनी आपल्या भाषणातून विरोधकांनाही दिला आहे.ज्या अडचणीच्या काळात शिंदे साहेबांनी मला मदत केली, त्या शिंदे साहेबांना मी कधीच सोडणार नाही, एक वेळ घरी बसेन पण शिंदे साहेबांना सोडणार नाही, असं सांगत शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल निलेश राणे यांनी जाहीरपणे कृतज्ञता व्यक्त केली.काही लोक म्हणतात की निलेश राणे आता दुसऱ्या पक्षात जाणार, अरे आयुष्यात कधी जाणार नाही, ज्या शिंदे साहेबांनी या कपाळाला गुलाल लावला हे त्यांचे उपकार मी आयुष्यात कधीही विसरणार नाही, कशाला जाऊ मी दुसरीकडे, अरे मी घरी बसेन, पण मी माझ्या शिंदे साहेबांना सोडणार नाही, असेही राणे यांनी यावेळी जाहीर केलं. मला तरी तिकीट देईन सांगितलं ते दिलंही आणि निवडूनही आणलं अशा शब्दात शिंदे यांचेही त्यांनी यावेळी कौतुक केलं.

आम्ही इकडे हा पक्ष बांधला त्यामुळे आता सगळेच बिथरले आहेत. यावेळी त्यांनी कसातरी निलेश राणे बदनाम झाला पाहिजे, कशीतरी शिवसेना बदनाम झाली पाहिजे, यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत. पण कोणी किती प्रयत्न केले तरीही ते जे विरोधक माझ्यावर टीका करत आहेत त्यांना आता मला परत पराभूत करण्यासाठी 25 वर्षे वाट बघावी लागेल. तुम्हाला मी लोकप्रतिनिधी व्हायला देणार नाही, या जिल्ह्यात तर नाही, कुठून तरी आयात करून काही आणलं तर मला माहित नाही अशा शब्दात नाव न घेता ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांना सुनावले आहे.मेहनतीने आलोय, कष्टाने आलो आहे, स्वतःला बदलून आलो आहे, लोकांसाठी खस्ता खालल्या आहेत, कोणी सांगितलं स्वभाव बदल, तोही बदलला, ते कशासाठी? माझ्या या सिंधुदुर्गसाठी… या सिंधुदुर्गने आमच्या राणे कुटुंबाला जे दिवस दाखवले म्हणून करायचं तर ते फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी, बाकी कोणासाठी नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केलं. कारण दहा वर्षानंतर कुठला कोण माजी खासदार कुठे आहे माहित नाही, महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही, असा टोला नाव न घेता विनायक राऊत यांनाही लगावला. पण दहा वर्षाच्या वनवासानंतर या निलेश राणेला पुन्हा जिवंत केलं तर ते या सिंधुदुर्ग जिल्ह्याने केला म्हणून जे काही करायचं ते आता फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी.मला आज शिंदे साहेबांसोबत भाषण करायचं होतं पण सामंत साहेब तुम्ही आहात मला कसलीच काळजी नाही, माझा शब्द आणि शब्द तुम्ही साहेबांपर्यंत पोहोचवाल, तुम्ही माझ्या बंधूसारखे आहात, असा विश्वास व्यक्त करत सामंत साहेब तुमचे प्रेम आमच्यावरती कायम असंच ठेवा, सिंधुदुर्ग जिल्ह्यावरही तुमचे प्रेम राहू द्या, तुमच्याकडे एमआयडीसी खातं आहे, तुम्ही नेहमी सांगता की निलेश राणे फिरून फिरून महाराष्ट्राचे सगळे बोलतील पण येतील कुडाळ मालवणवरच म्हणूनच तुम्हाला विनंती करतोय, तुम्ही मला मागे सांगितलं होतं निलेश तुला मला काहीतरी द्यायचे आहे, तुम्हाला जी काही घोषणा करायची आहे, ती आजच करा, अशीही मागणी निलेश राणे यांनी हसत सामंत यांच्याकडे यावेळी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी आपल्यासाठी केलेला रक्ताचे पाणी सांगत या माणसाने योगदान कुठे फुकट जायला नको असं सांगत दत्ता सामंत हे आपल्या पदाधिकाऱ्याचंही त्यांनी कौतुक केलं.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.