शत्रूच्या जाळ्यात फसू नका, उद्या नमाजावेळी…; पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसींचं मुस्लिमांना आवाहन.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी जोर धरु लागली आहे.जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी जोर धरु लागली आहे. निष्पाप पर्यटकांना दहशतवादी हल्ल्यात जीव गमवावा लागला. त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. पहलगाम हल्ल्याबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. मुस्लिम समाजाला त्यांनी खास आवाहनही केलं.

शुक्रवारच्या नमाजावेळी (नमाज-ए-जुम्मा) सगळ्या मुस्लिमांनी त्यांच्या दंडावर काळी पट्टी बांधून मशिदीत जावं. त्यामुळे दहशतवादाविरोधात एकजुटीचा संदेश जाईल. दंडावर पट्टी बांधून आपण सगळ्यांना स्पष्ट संदेश देऊ. आम्ही भारतीय परदेशी शक्तींना इथली शांतता धोक्यात आणू देणार नाही. या हल्ल्यानंतर शांतता भंग करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शक्ती काश्मिरी मुस्लिमांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू शकतात. अशा परिस्थितीत आपल्या सगळ्यांना एक होऊन शत्रूचा कट हाणून पाडायचा आहे. त्यांचा अंतस्थ हेतू हाणून पाडणं अतिशय गरजेचं आहे. मी तमाम भारतीयांना आवाहन करतो की शत्रूच्या जाळ्यात अडकू नका, असं ओवैसी म्हणाले.

धार्मिक आणि सामुदायिक मुद्द्यांच्या आधारे उचकावण्याचे राजकीय प्रयत्न होऊ शकतात. सगळ्या भारतीयांनी त्यापासून दूर राहावं. एकजूट कायम राखून शांतता आणि सौहार्द कायम राखावं. दहशतवादाचा कोणताही धर्म नसतो. अशा प्रकारचे भ्याड हल्ले देशात दुही माजवण्यासाठी होत असतात, असं खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं.पहलगाममध्ये २६ निर्दोष पर्यटकांचा हकनाक बळी गेल्यामुळे देशभर संतापाची लाट आहे. याच पार्श्वभूमीवर असदु्द्दीन ओवैसी यांनी देशवासीयांना, खासकरुन मुस्लिम समुदायाला उद्देशून महत्त्वाचं आवाहन केलं आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून १७ जण जखमी झाले. पहलगामच्या बैसरण खोऱ्यात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. तिथे असलेल्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन गोळ्या झाडण्यात आल्या.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.