पाकिस्तानचा चडफडाट! भारताकडून राजनैतिक कोंडीनंतर सिमला करार स्थगित, भारतीय विमानांना हवाईक्षेत्र बंद.

भारताने पाकिस्तानची राजनैतिक कोंडी करणारे निर्णय घेत बुधवारी जोरदार प्रहार केला. त्यामुळे संतापलेल्या पाकिस्तानने गुरुवारी प्रचंड आगपाखड करत सिमला करारासह इतर सर्व द्विपक्षीय करार रद्द करण्याचा निर्णय घेतलापहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची राजनैतिक कोंडी करणारे निर्णय घेत बुधवारी जोरदार प्रहार केला. त्यामुळे संतापलेल्या पाकिस्तानने गुरुवारी प्रचंड आगपाखड करत सिमला करारासह इतर सर्व द्विपक्षीय करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या तडाख्याला प्रत्युत्तर देण्याच्या नादात राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांवरून पाकिस्तानचा चडफडाट स्पष्ट दिसून येतो.पहलगाम हल्ल्यानंतर भारताने तातडीने जाहीर केलेल्या निर्णयांमुळे हादरलेल्या पाकिस्तानने पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये भारताशी सुरू असलेला व्यापार स्थगित करण्यासह, भारतीय विमानांसाठी आपले हवाईक्षेत्र महिनाभर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. वाघा चेकपोस्ट बंद करणे, सार्क व्हिसा सवलत योजनेंतर्गत भारतीयांना देण्यात आलेले व्हिसा रद्द करणे

(यातून शीख भाविकांना वगळण्यात आले आहे), भारतीय उच्चायुक्तालयातील लष्करी सल्लागारांना पाक सोडून जाण्यास सांगणे, असे भारताचे अनुकरण करणारे निर्णयही या बैठकीत घेण्यात आले. तसेच, सिंधू पाणीवाटप करार स्थगित करून आमचे पाणी वळवण्याचा कोणताही प्रयत्न युद्धाची कृती मानली जाईल, असा पोकळ इशाराही पाकिस्तानने दिला आहे.या बैठकीमध्ये पाकच्या संरक्षणमंत्र्यांनी भारताच्या संभाव्य कारवाईविषयी वाटणारी भीती व्यक्त केली. भारत दहशतवादी कृत्यांद्वारे पाकमधील विविध शहरांना लक्ष्य करण्याची योजना आखत असल्याच्या अहवालांचा उल्लेख संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला. ‘आमच्या नागरिकांना लक्ष्य केले गेले तर भारतीय नागरिकांनाही त्रास होईल’, असे त्यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. त्यांनी स्पष्टपणे १९७२च्या शिमला करारावर भर दिला. या करारात असे म्हटले आहे की, मतभेद वाटाघाटींद्वारे सोडवले जातील आणि दोन्ही देशांमधील नियंत्रणरेषेला मान्यता दिली जाईल.‘शिमला करारासह भारतासोबतचे सर्व द्विपक्षीय करार स्थगित ठेवण्याचा अधिकार पाकिस्तान वापरेल. जोवर भारत पाकिस्तानमध्ये दहशतवाद भडकवण्याच्या, आंतरराष्ट्रीय हत्या करण्याच्या आणि आंतरराष्ट्रीय कायदा तसेच काश्मीरवरील संयुक्त राष्ट्र ठरावांचे पालन न करण्याच्या वर्तनापासून परावृत्त होत नाही, तोवर हे करार स्थगित राहतील’, असे आसिफ म्हणाले.

भारतातून वाघा सीमेवरून होणारी सर्व सीमापार वाहतूक, कोणत्याही अपवादाशिवाय, स्थगित करण्याचा निर्णय पाकने घेतला आहे. जे पाक नागरिक वैध कागदपत्रांसह भारतात गेले आहेत, ते या मार्गाने ३० एप्रिलपर्यंतच परत येऊ शकतात, असेही पाकने म्हटले आहे.इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातील लष्करी सल्लागारांनी तसेच त्यांच्या सहायक कर्मचाऱ्यांनी ३० एप्रिलपर्यंत पाकिस्तान सोडून जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, भारताच्या निर्णयाप्रमाणेच इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्या ३०पर्यंत कमी करण्याचे निर्देशही पाकने दिले आहेत. ‘भारतासोबतचा सर्व व्यापार, पाकिस्तानमार्फत कोणत्याही तिसऱ्या देशाकडून आणि तिसऱ्या देशाकडे जाणारा व्यापारदेखील, तत्काळ स्थगित करण्यात आला आहे’, असे पाकिस्तानने प्रसृत केलेल्या निवेदनात म्हटले आहे.सिंधू जलवाटप करार स्थगित करण्याचा निर्णय फेटाळत असल्याचे पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीने म्हटले आहे. हे जलवाटप २ कोटी ४० लाख पाकिस्तानींसाठी जीवन असल्याचे समितीने म्हटले आहे. ‘सिंधू करारानुसार पाकिस्तानच्या वाट्याला आलेल्या पाण्याचा प्रवाह वळवण्याचा किंवा रोखण्याचा प्रयत्न केला तर ती युद्धाची कृती मानली जाईल’, असे समितीच्या निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तान सर्व प्रकारच्या दहशतवादाचा स्पष्टपणे निषेध करत असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.