बीडचा खरंच झालाय बिहार? ज्या ढाब्यावर पोटभरून जेवले त्याच मालकावर जीवघेणा हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू.

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे एका ढाबा मालकावर आणि त्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला झाला, ज्यात मालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बिलाच्या कारणावरून झालेल्या वादातून आनंदगाव येथील काही ग्राहकांनी हे कृत्य केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.बीडच्या माजलगावमध्ये ढाबा मालक आणि त्याच्या मुलावर प्राण घातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार रात्री उघडकीस आला होता. यात गंभीर जखमी असलेल्या बाप लेकावर उपचार सुरू होते यात महादेव गायकवाड यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तसेच बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था आहे का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. डोक्यामध्ये गंभीर दुखापत असल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

माजलगाव शहरापासून ४ किमी अंतरावर नागडगाव पाटी कॉनर्रवरील गावरान ढाबा मालक महादेव गायकवाड (५४ वर्षे) रा. मंजरथ रोड माजलगाव यांच्या काल संध्याकाळी ७.३० ढाब्यावर बसलेल्या माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील ग्राहकांनी बिलाच्या कारणाने डोक्यावर वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात ढाबा मालक महादेव गायकवाड व मुलगा आशुतोष महादेव गायकवाड गंभीर जखमी झाले होते. महादेव गायकवाड यांना संभाजीनगर येथे उपचाराठी हलवण्यात होते मात्र उपचारादरम्यान त्यांचे प्राणज्योत मालवली. तर मुलगा आशुतोष महादेव गायकवाड याच्यावर उपचार सुरू असून माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.हॉटेलमध्ये आरोपी आले जेवले आणि त्यानंतर त्यांनी बिलाच्या कारणावरून थेट हॉटेल मालकाला मारहाण केली.

मुलाच्या भांडणात पडलेल्या वडिलांनाही आरोपींनी मारहाण केली होती. या धक्कादायक प्रकरणाने बीड जिल्हा हादरला आहे. उपचारादरम्यान मालकाचा मृत्यू झाल्याने गायकवाड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. पोलीस आरोपींना कधी पकडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.दरम्यान, माजलगावमध्ये घडलेल्या घटनेची सर्वत्र चर्चा असून बीडमधील गुंडाराज समोर आले आहे. कोणीला उठतो आणि वाटेल त्याच्यावर हल्ला किंवा खून करत आहे. त्यामुळे कायद्याचा काही धाक आहे की नाही असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील गुंडाराजचे भयाण वास्तव समोर आले होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.