विधानसभा निवडणुकीत शिवसेना उबाठा आणि मनसेची धूळधाण उडाल्यानंतर आता ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची भाषा केली आहे. महाराष्ट्राच्या हितापुढे आमची भांडणं, वाद क्षुल्लक असल्याचं राज ठाकरे एका मुलाखतीत म्हणाले.मुंबई: विधानसभा निवडणुकीत शिवसेना उबाठा आणि मनसेची धूळधाण उडाल्यानंतर आता ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची भाषा केली आहे. महाराष्ट्राच्या हितापुढे आमची भांडणं, वाद क्षुल्लक असल्याचं राज ठाकरे एका मुलाखतीत म्हणाले. राज यांनी साद घातल्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. मी सोबत येण्यास तयार आहे. माझ्याकडून सगळी भांडणं मिटली. पण माझी एक अट आहे. माझ्यासोबत येऊन हित आहे की भाजपसोबत जाऊन हित आहे, ते आधी ठरवा, असं उद्धव ठाकरे कामगार सेनेच्या मेळाव्यात म्हणाले.
Raj Thackeray यांनी टाळीसाठी हात पुढे केलेला असताना Uddhav Thackeray यांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा झडू लागली आहे. यावर शिंदेंच्या शिवसेनेतून पहिली प्रतिक्रिया आली आहे. राज आणि उद्धव यांची विधानं मी ऐकलेली नाहीत. मी दौऱ्यावर असल्यानं त्यांची विधानं ऐकू शकलो नाही. पण राजकारणात काहीही घडू शकतं. सकाळचा माणूस दुपारी कुठे असेल आणि दुपारचा माणूस संध्याकाळी कुठे असेल. काही सांगता येत नाही, असं शिवसेनेचे नेते आणि मंत्री Bharat Gogavale म्हणाले.’ते (उद्धव आणि राज) भाऊ-भाऊ आहेत. त्यांना जर का पाझर फुटला असेल एकमेकांसाठी तर आम्हाला त्यातलं काय माहीत नाही. आम्ही महायुतीचं काम करतोय.









