भावांना पाझर फुटला असेल तर…; ठाकरे बंधूंच्या संभाव्य मनोमिलनावर शिंदेसेनेची प्रतिक्रिया.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना उबाठा आणि मनसेची धूळधाण उडाल्यानंतर आता ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची भाषा केली आहे. महाराष्ट्राच्या हितापुढे आमची भांडणं, वाद क्षुल्लक असल्याचं राज ठाकरे एका मुलाखतीत म्हणाले.मुंबई: विधानसभा निवडणुकीत शिवसेना उबाठा आणि मनसेची धूळधाण उडाल्यानंतर आता ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची भाषा केली आहे. महाराष्ट्राच्या हितापुढे आमची भांडणं, वाद क्षुल्लक असल्याचं राज ठाकरे एका मुलाखतीत म्हणाले. राज यांनी साद घातल्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. मी सोबत येण्यास तयार आहे. माझ्याकडून सगळी भांडणं मिटली. पण माझी एक अट आहे. माझ्यासोबत येऊन हित आहे की भाजपसोबत जाऊन हित आहे, ते आधी ठरवा, असं उद्धव ठाकरे कामगार सेनेच्या मेळाव्यात म्हणाले.

Raj Thackeray यांनी टाळीसाठी हात पुढे केलेला असताना Uddhav Thackeray यांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा झडू लागली आहे. यावर शिंदेंच्या शिवसेनेतून पहिली प्रतिक्रिया आली आहे. राज आणि उद्धव यांची विधानं मी ऐकलेली नाहीत. मी दौऱ्यावर असल्यानं त्यांची विधानं ऐकू शकलो नाही. पण राजकारणात काहीही घडू शकतं. सकाळचा माणूस दुपारी कुठे असेल आणि दुपारचा माणूस संध्याकाळी कुठे असेल. काही सांगता येत नाही, असं शिवसेनेचे नेते आणि मंत्री Bharat Gogavale म्हणाले.’ते (उद्धव आणि राज) भाऊ-भाऊ आहेत. त्यांना जर का पाझर फुटला असेल एकमेकांसाठी तर आम्हाला त्यातलं काय माहीत नाही. आम्ही महायुतीचं काम करतोय.

महायुती भक्कम झालेली आहे. महायुतीला आता कोणी छेद देऊ शकत नाही. दोघे एकत्र येण्याबद्दल बोलत असतील तर आम्हाला त्यात कोणतीच अडचण नाही. आम्ही आमचं काम करतोय. आमच्या कामाच्या जोरावरच सत्ता परत आलेली आहे. आम्ही इतक्या वेगानं पुढे गेलोय की आता महायुतीला रोखणं कठीण आहे,’ असं मंत्री भरत गोगावले म्हणाले.दोनच दिवसांपूर्वी DCM Eknath Shinde मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी त्यांच्यात झालेली चर्चा फिस्कटली का, असा प्रश्न गोगावलेंना विचारण्यात आला. त्यावर त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही. मला त्याबद्दल शिंदे साहेबांना विचारावं लागेल. तुम्ही कशासाठी गेला होतात? काय चर्चा झाली? आम्ही विचारल्याशिवाय आम्हाला त्याबद्दल कळणार नाही. सध्या साहेब २-३ दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. शिंदे साहेब सध्या गावी गेले आहेत. तिकडून ते उद्या, परवा परततील. कॅबिनेटच्या बैठकीत ते भेटतील. तेव्हा त्यांना विचारतो आणि तुम्हाला सांगतो, असं गोगावले म्हणाले.राज आणि उद्धव ठाकरे Mumbai BMC Election साठी एकत्र येत आहेत का. त्यांची युती झाल्यास तुमच्या पक्षाचा तोटा होईल का, असे प्रश्न गोगावलेंना विचारले गेले. त्यावर आम्हाला तोटा होण्याची शक्यता वाटत नाही. कारण शिंदे साहेबांनी मुंबईतील उबाठा बऱ्यापैकी रिकामी केली आहे. राहिलेलेदेखील येण्याच्या तयारीत आहेत. शिंदे साहेबांचं मिशन सुरु आहे. त्यामुळे काही अडचण होणार नाही, असं उत्तर गोगावलेंनी दिलं.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.