महिला वकील मारहाण प्रकरणाची दुसरी बाजू समोर.

महिला वकिलाला आमच्यापैकी कुणीही मारहाण केली नाही. उलट या अगोदरही तिने गावातील अनेकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. गावातील मंदिराचा आवाज तिला सहन होत नाही, पिठाची चक्की सुरू केली तर बंद करा म्हणून सांगते, नेमकं खावं काय आणि रहावं कसं. असा सवाल बीडच्या अंबाजोगाई येथील सनगावच्या गावकऱ्यांनी केला आहे.अंबाजोगाईतील सत्र न्यायालयाच्या महिला वकिलाला गावच्या सरपंच आणि १० जणांनी मारहाण केल्याची बातमी काल(१८ एप्रिल) प्रसारित झाल्यानंतर त्याच गावतील गावकऱ्यांनी महिला वकिलाचे आरोप फेटाळून लावले आहेत. कुणीही महिलेला मारले नसल्याचे गावकऱ्यांनी म्हटले आहे.महिला वकिलाला आमच्यापैकी कुणीही मारहाण केली नाही. उलट या अगोदरही तिने गावातील अनेकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. गावातील मंदिराचा आवाज तिला सहन होत नाही, पिठाची चक्की सुरू केली तर बंद करा म्हणून सांगते, नेमकं खावं काय आणि रहावं कसं.

असा सवाल बीडच्या अंबाजोगाई येथील सनगावच्या गावकऱ्यांनी केला आहे. तसेच काही वाद असतात तर आम्ही महिलांनी मारहाण केली असती पुरुषांचा मारहाण करण्याचा संबंधच येत नाही हा खोटा आरोप आहे. असेही गावतील महिलांनी सांगितले. गावकऱ्यांनी पुढे असेही सांगितले की, ही महिला वकील असल्यामुळे आम्हालाच अनेक वेळा खोट्या गुन्हात अडकवले आहे. माझ्यावर सुद्धा खोटा गुन्हा दाखल केला होता असं एका वयोवृद्ध गावकऱ्याने सांगितले.काल (१८ एप्रिल) अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या एका महिलेने गावातील ध्वनि प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात, घराजवळ लाऊडस्पीकर लाऊ नयेत याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या.

आपल्याविरोधात तक्रार केली म्हणून गावच्या सरपंच आणि इतर दहा पुरूषांनी मिळुन वकिल महिलेला शेतात रिंगण करून काठ्या आणि JCBपाईपने जबर मारहाण केली असा आरोप महिला वकिलाने केला होता. इतकेच नाही तर, महिलेचं शरीर काळं-निळं पडेपर्यंत महिलेला मारहाण करण्यात आल्याचे त्या महिलेने व्हिडिओद्वारे दाखवले होते. या मारहाणीत महिला बेशुद्ध झाली. उपचाराकरिता तिला दवाखान्यात दाखल करण्यात आलं. परंतु व्यवस्थित उपचार न करता महिलेला एका रात्रीच घरी पाठवण्यात आलं असा आरोपही महिलेने केला होता.दरम्यान,आता गावकऱ्यांनी महिलेविरोधात माहिती देत, सदर महिलेला आम्ही मारहाण केलेली नाही. ती महिला खोटे बोलत आहे असे गावकऱ्यांनी म्हटले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.