अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या ज्ञानेश्वरी अंजान या तरुणीला सनगाव येथील सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय. या प्रकरणी आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.मुख्यमंत्री महोदय हे फोटो पहा आणि तुम्हाला झोप कशी लागते ते सांगा? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी ज्ञानेश्वरी अंजान (Gyaneshwari Anjan) मारहाण प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) जाब विचारला आहे.डीजेच्या आवाजाचा त्रास होत असल्याने त्याची तक्रार केल्याने एका महिला वकिलाला गावच्या सरपंचाने कार्यकर्त्यांसोबत मिळून बेदम मारहाण केली. ही घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात घडली आहे.










