पाईपलाईन आली पण पाणीच नाही, ‘हर घर जल’ योजना अंगणी, तरी १२ वर्षांच्या चिमुरडीचा पाण्यासाठी जीव गेला.

पिण्याच्या पाण्यासाठी कठोडा गावाजवळील पारधी बेड्यातील महिला आणि मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज जीव धोक्यात घालून काही अंतरावरील अरुणावती नदीवरच अवलंबून राहावे लागते. रविवारी सकाळी वेदिका गावातील महिलांसोबत, याच पाणी भरण्याच्या प्रयत्नात पाय घसरून नदीच्या डोहात बुडाली आणि तिचा दुर्दैवी अंत झाला. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये सुरू केलेल्या महत्वाकांक्षी ‘हर घर जल’ (जलजीवन मिशन) योजनेत या वस्तीचा समावेश आहे.यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील कठोडा येथील पारधी बेड्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने अरुणावती नदीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या वेदिका सुरेश चव्हाण (१२) रा.काठोळा या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. या हृदयद्रावक घटनेने, शासकीय योजनांच्या प्रशासकीय अनास्थेचे भीषण वास्तव समोर आणले आहे.

वेदिकाचा मृत्यू हा शासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणाचा बळी असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
कठोडा गावाजवळील या पारधी बेड्यावर सुमारे २०० नागरिक वीज, पक्के रस्ते आणि मुख्य म्हणजे स्वच्छ पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांअभावी अनेक वर्षांपासून जगत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी येथील महिला आणि मुलांना दररोज जीव धोक्यात घालून काही अंतरावरील अरुणावती नदीवरच अवलंबून राहावे लागते. रविवारी सकाळी वेदिका गावातील महिलांसोबत, याच पाणी भरण्याच्या प्रयत्नात पाय घसरून नदीच्या डोहात बुडाली आणि तिचा दुर्दैवी अंत झाला. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये सुरू केलेल्या महत्वाकांक्षी ‘हर घर जल’ (जलजीवन मिशन) योजनेत या वस्तीचा समावेश आहे.मात्र, ही योजना येथे पूर्णतः

फसल्याचे चित्र आहे. कोट्ययवधी रुपये खर्च होऊनही या वस्तीपर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचलेले नाही. मग ’हर घर जल’ यशस्वी कसे? योजनांचा पैसा जातो कुठे? असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. आर्णी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवला आहे. मात्र, या मृत्यूने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि मूलभूत सुविधा पुरवण्यातील अपयशावर गंभीर प्रश्‍न निर्माण केले आहेत. आतातरी प्रशासन जागे होऊन या वस्तीला न्याय देणार का, याकडे लक्ष लागले आहे. सरकारी योजनांपासून आमचे गाव कोसोदूर आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागते. आणखी किती वेदिकांचा बळी गेल्यावर शासनाला आणि प्रशासनाला जाग येईल असा उद्विग्न सवाल मृत वेदिकाचा नातेवाईक यांनी केला आहे.आर्णी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. मात्र, जिल्हाधिकारी विकास मीना यांनी भविष्यात अशी घटना घडणार नाही यासाठी उपाययोजना केल्या जात आहे.या घटनेने शासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर आणि संवेदनशीलतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.