‘पक्ष अजित पवारांना दिलाय, त्यामुळे शरद पवारांकडे आता… ‘ पडळकरांची पवारांवर घणाघाती टीका, संघर्ष पेटणार?

 गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वाघ्या कुत्र्यावरून राजकारण पेटलं आहे. फक्त वाघ्या कुत्राच नाही तर इतिहासातील इतरही काही संदर्भावरून महाराष्ट्रात नवनवे वाद होताना दिसत आहेत. या सगळ्या वादावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संभाजी ब्रिगेड आणि शरद पवार यांना जबाबदार धरलं आहे.गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वाघ्या कुत्र्यावरून राजकारण पेटलं आहे. फक्त वाघ्या कुत्राच नाही तर इतिहासातील इतरही काही संदर्भावरून महाराष्ट्रात नवनवे वाद होताना दिसत आहेत. या सगळ्या वादावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संभाजी ब्रिगेड आणि शरद पवार यांना जबाबदार धरलं आहे.

जेव्हा ब्रिगेडिंगचा नेता संकटात येतो तेव्हा अशा प्रकारचे खुसपट उचकटून काढले जातात. असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांना उद्देशून केला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘जेव्हा ब्रिगेडींचा नेता संकटात येतो तेव्हा असं काहीतरी खुसपट ते काढतात. शरद पवारांना फॉर असणाऱ्या या संघटना असा नवीन इतिहास काढत असतात, त्यामुळे हे वाद तयार होतात. ब्राह्मणांना टोकाचा विरोध करायचा आणि बहुजनांची माथी भडकवायची आणि त्यातून सत्ता लाटायची हा उद्योग गेले अनेक वर्ष सुरू होता. पण २०१४0, २०१९ आणि २०२४ साली लोकांनी हा उद्योग उडवून लावला,’ असे म्हणत पडळकर यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.

तर, ‘माझी शरद पवारांना आता एक विनंती आहे त्यांनी त्यांचा सगळा पक्ष अजित पवारांकडे दिलेला आहे, त्यामुळे त्यांच्याकडे आता फावला वेळ आहे. या फावळ्या वेळात त्यांनी त्यांना पाहिजे तसा इतिहास लिहावा. एखाद्या जातीला कसं टार्गेट करायचं, कोणती जात मातीत घालायची, कुठल्या महापुरुषाला वर काढायचं, कुठल्या महापुरुषाचे नाव घेतल्यानंतर मतांचं राजकारण होईल. कुठल्या जातीला जास्त शिव्या दिल्यानंतर जास्त मतं आपल्या बाजूला येतील. पुढच्या दोन-चार पिढ्या मातीत कशा जातील. अशा पद्धतीचा इतिहास त्यांनी एकदाच लिहून टाकावा. त्यामुळे परत परत नव्याने इतिहास लिहिण्याची गरज पडणार नाही,’ असे देखील गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.गोपीचंद पडळकर यांच्या या घणाघाती टिकेनंतर राज्यात पुन्हा एकदा पडळकर विरुद्ध पवार असा संघर्ष नव्याने पाहायला मिळू शकतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त पुण्यात धनगरी नाद हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले आहे. मात्र या कार्यक्रमाला अजित पवार हे असणार आहेत का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘नाही येणार आम्ही त्यांना बोलावलेचं नाही.’ असं थेट पडळकर म्हणाले आहेत. त्यामुळे आता पडळकर यांच्या वक्तव्यानंतर महायुतीमध्ये नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.