काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांना अटक, बिहारमध्ये सुरू होती पदयात्रा, ताब्यात घेण्याचं कारण काय?

कन्हैया कुमार यांना पोलिसांनी अटक केली आहे. बिहारमध्ये बेरोजगारी आणि स्थलांतराच्या विरोधात काँग्रेसचे नेते एनएसयुआयचे प्रभारी कन्हैया कुमार पदयात्रा करत होते.बिहारमध्ये बेरोजगारी आणि स्थलांतराच्या विरोधात काँग्रेसचे नेते एनएसयुआयचे प्रभारी कन्हैया कुमार पदयात्रा करत होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. कन्हैया कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री निवासस्थानाला घेराव घालण्याची योजना आखली होती.ते मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार होते. ‘पलायन रोको-नौकरी दो’ या यात्रेच्या शेवटी कन्हैया कुमार यांनी हे नियोजन केले होते. पण पोलिसांनी त्यांना आधीच ताब्यात घेतले. युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब आणि युवा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष शिव प्रकाश गरीब दास यांना सुद्धा अटक झाली.

DSP कृष्ण मुरारी यांनी सांगितले की, “जे लोक आंदोलनाचे नेतृत्व करत होते, त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही काही लोकांना ताब्यात घेतले आहे. सगळ्यांना कोतवाली पोलीस स्टेशनला नेले जात आहे. या लोकांना आधी शांतपणे आंदोलन करण्याची सूचना दिली होती. पण जमाव खूप आक्रमक झाला, त्यामुळे पाण्याचे फवारे मारावे लागले. आम्ही 15 ते 20 लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यात कन्हैया कुमार पण आहेत.”कन्हैया कुमार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते मुख्यमंत्री यांच्या घराला घेराव घालण्यासाठी निघाले होते. पोलिसांनी कन्हैया कुमार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी सगळ्यांना राजपूर पुलावरच थांबवले. पण कार्यकर्ते तिथेच थांबून घोषणा देत होते.यात्रेत राहुल गांधी झाले होते सहभागीकन्हैया कुमार यांच्या ‘पलायन रोको-नौकरी दो’ या यात्रेत काँग्रेसचे मोठे नेते सहभागी झाले होते. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी बेगुसरायला आले होते. तर सचिन पायलट सुद्धा पदयात्रेत सहभागी झाले. या पदयात्रेचा उद्देश बिहारमधील बेरोजगारी आणि लोकांचे शहरांकडे कामासाठी स्थलांतर करणे यावर लक्ष केंद्रित करणे हा होता. कन्हैया कुमार आणि त्यांच्या समर्थकांनी सरकारला या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना खीळ बसली.आता या अटकेनंतर काँग्रेस कार्यकर्ते काय भूमिका घेतात आणि सरकार यावर काय प्रतिक्रिया देते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.