राजनंदिनी कांबळे या विद्यार्थिनीला राहत्या घरात विजेचा जबर शॉक लागला. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा घरातील जिन्यावर पडल्या होत्या सोलापूर शहरात मंगळवारचा दिवस हा विद्यार्थ्यांसाठी काळवार ठरला. मंगळवारी एकाच दिवसात दोन अतिशय दुर्दैवी घटना घडल्या. अनुराग राठोड या शाळकरी विद्यार्थ्याचा स्कूल बसच्या चाकाखाली येऊन मंगळवारी दुपारी मृत्यू झाला. या घटनेने सोलापूर शहर हळहळले. ही घटना ताजी असताना मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
राजनंदिनी कांबळे या विद्यार्थिनीला राहत्या घरात विजेचा जबर शॉक लागला. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा घरातील जिन्यावर पडल्या होत्या. नंदिनी जिन्यावर जाताना तिला विजेचा जबर धक्का बसला, त्यातच राजनंदिनी कांबळे हिला प्राण गमवावे लागल्याची माहिती आहे.सोलापूर शहरात मंगळवारी सांयकाळी वादळी वारा सुटून अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या होत्या. सोलापूर शहरात असलेल्या जुना एम्प्लॉयमेंट चौकातील कोनापुरे चाळ येथे विजेच्या तारा तुटल्या होत्या, अशी नागरिकांनी माहिती दिली. सायंकाळी साडेसहा वाजल्यानंतर विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली.









