उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात त्यांच्या वर्चस्वाला शह देण्याची तयारी भाजपनं सुरु केली आहे. त्यासाठी भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक आधीच सक्रिय झाले आहेत.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात त्यांच्या वर्चस्वाला शह देण्याची तयारी भाजपनं सुरु केली आहे. त्यासाठी भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक आधीच सक्रिय झाले आहेत. नाईकांचं वर्चस्व असलेल्या नवी मुंबईतील बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंच्या पक्षातील प्रभावी माजी नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यासाठी शिंदेसेनेचे प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे ठाणे महापालिका हद्दीत आपली ताकद वाढवण्यासाठी भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेस शपचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थक नगरसेवकांना गळाला लावण्याची खेळी भाजपनं सुरु केली आहे. महापालिका निवडणुकीत युती न झाल्यास शिंदेंसमोर अधिकाधिक तगडं आव्हान निर्माण करण्याची व्यूहनीती भाजपनं आखली आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध शिंदेसेना संघर्षाचा फटका नवी मुंबईत ठाकरेंना आणि ठाण्यात, विशेषत: कळव्यात आव्हाडांना बसणार आहे.
आमदार जितेंद्र आव्हाडांचं कळवा, विटावा, मुंब्रा भागात चांगलं प्राबल्य आहे. दिव्याच्या शेजारी असलेल्या भागातही आव्हाड यांना मानणारा मोठा वर्ग आहे. महापालिका निवडणुकांमध्ये आव्हाडांचं प्राबल्य कायम दिसून आलं आहे. ठाणे महापालिका हद्दीतील ३९ नगरसेवक कळवा-मुंब्रा भागातून निवडून येतात. ठाणे महापालिकेत एकूण १३१ प्रभाग आहेत. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत एकसंध शिवसेनेनं ६७, एकसंध राष्ट्रवादीनं ३४ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपनं २३ जागांवर मजल मारली होती. आता आव्हाड समर्थक माजी नगरसेवकांना आपल्या बाजूला खेचण्याचे प्रयत्न भाजपनं सुरु केले आहेत.ठाणे शहर, कोपरी पाचपाखाडी आणि ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघांमध्ये शिंदेंची प्रचंड ताकद आहे. तर जुन्या ठाण्यात भाजपचं प्राबल्य आहे.









