मराठीत बोलण्याचा मुद्दा, पण बँँकाही आवश्यक, राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंत म्हणाले…

उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. मराठी भाषेच्या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या परवानगीनंतरच ही भेट घेतल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उदय सामंत म्हणाले की, मराठीच्या मुद्दयाबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करणार आहे.आज सकाळी उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलीये. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये भेट झालीये. या भेटीबद्दल बोलताना उदय सामंत म्हणाले की, मी एकनाथ शिंदे यांची परवानगी घेऊन आलो होतो. मराठीच्या मुद्द्यावर चर्चा झाली. मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करीन मराठी बाबत. मराठी भाषिकावर काही ठिकाणी अन्याय होतो, यावर राज ठाकरेंसोबत चर्चा झाली आहे. काही दिवसांपूर्वीही उदय सामंत हे राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते.

उदय सामंत हे पुढे बोलताना म्हणाले की, बाकीच्या भाषेचा सन्मान आम्ही करतो, तसा आपल्या भाषेचा देखील व्हावा ही राज ठाकरेंची भूमिका आहे आणि आमची देखील. राज्यातील बँकांचे व्यवहार मराठीत झाले पाहिजे. यासाठी सर्व समित्याची बैठक घेईन आणि काय कारवाई करता येतील याबाबत निर्णय घेऊ. राज्यातील बँकांमधील व्यवहार हे जास्तीत जास्त मराठीतच झाले पाहिजे, ही मनसेही भूमिका आहे. या मुद्दावरूनच उदय सामंत हे राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते.राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्यात साधारणपणे तासभर चर्चा झाली. सुरूवातीला चर्चा होती की, राज्यातील आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असावी. मात्र, त्यानंतर उदय सामंत यांनी भेटीचा विषय नेमका काय होता, हे स्पष्ट केले. फक्त हेच नाही तर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परवानगी घेऊनच आपण इथे आल्याचेही म्हटले.

उदय सामंत हे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या.मुळात म्हणजे मनसेने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला पाठिंबा दिला. अनेकांनी त्यावेळी राज ठाकरे यांच्यावर टीकाही केली. कुंभमेळ्यातील पवित्रस्नान आणि गंगेची स्वच्छता यावरून राज ठाकरे हे भाजपाला टार्गेट करताना काही दिवसांपूर्वीच पुण्यातील मेळाव्यात दिसले. त्यांनी कुंभमेळ्यातील पवित्रस्नानाबद्दल मोठे विधान केले. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.