व्हिडिओ कॉल करुन पत्नीचा गळफास, पतीनंही जीव दिला; लग्नानंतर ४० दिवसांनी जोडप्यानं जीवन संपवलं.

किरकोळ वादातून नवविवाहित दाम्पत्यानं आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील केतुरा येथे घडली. अक्षय गालफाडे (२७) आणि पत्नी शुभांगी (२१) अशी मृतांची नावं आहेत. दोघांच्या पार्थिाववर गुरुवारी अंत्यविधी करण्यात आले.किरकोळ वादातून नवविवाहित दाम्पत्यानं आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील केतुरा येथे घडली. अक्षय गालफाडे (२७) आणि पत्नी शुभांगी (२१) अशी मृतांची नावं आहेत. दोघांच्या पार्थिाववर गुरुवारी अंत्यविधी करण्यात आले. नवदाम्पत्याच्या निधनानं कुटुंबियांना धक्का बसला असून गावावर शोककळा पसरली आहे.केतुरा येथील अक्षय गालफाडेचा विवाह जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील शुभांगीसोबत ४० दिवसांपूर्वी झाला. लग्नासाठी काढलेली सुट्टी संपल्यावर अक्षय पुण्याला निघून गेला. तिथे तो लाईट फिटिंगचं काम करायचा. नुकताच तो गावाकडे आला होता. बुधवारी म्हणजेच २ एप्रिलला तो पुन्हा पुण्याला जाण्यास निघाला.

मलाही सोबत न्या, असा हट्ट शुभांगीनं पुण्याला निघालेल्या अक्षयकडे धरला. त्यावर पुण्यात भाड्यानं खोली घेतो आणि मग तुला सोबत नेतो, अशा शब्दांत अक्षयनं शुभांगीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण शुभांगी ऐकायला तयार नव्हती. सोबत नेलं नाही, तर जीव देईन, अशी थेट धमकी देत तिनं दिली. शुभांगी टोकाचं पाऊल उचलणार नाही, असं अक्षयला वाटत होतं. त्यामुळे शुभांगीला मागे सोडून तो पुण्याला जाण्यासाठी घरातून निघाला.अक्षय बसमधून पुण्याला जाण्यास निघालेला असताना शुभांगीनं त्याला व्हिडीओ कॉल केला. त्यावेळी अक्षय नवगण राजुरीजवळ पोहोचला होता. शुभांगीनं अक्षयला व्हिडीओ कॉल करुन गळफास लावून घेतला. यानंतर अक्षय तातडीनं माघारी फिरला. शुभांगीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात सुरु असताना दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांमध्ये वाद झाले. शुभांगीच्या कुटुंबियांनी आक्रमक पवित्रा घेतला.शुभांगीनं केलेली आत्महत्या, त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे तणावाखाली आलेल्या अक्षयनं शेतात जाऊन गळफास घेतला. या प्रकरणाची नोंद बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. गुरुवारी दुपारी अक्षय आणि शुभांगी यांच्या पार्थिवावर केतुरा गावात अंत्यविधी करण्यात आले. एकाच चितेवर दोघांचे अंत्यसंस्कार पार पडले. अक्षयच्या कुटुंबियांनी त्याच्या मृत्यूपश्चात नेत्रदान केलं. नवदाम्पत्यानं केलेल्या आत्महत्येनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.