किरकोळ वादातून नवविवाहित दाम्पत्यानं आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील केतुरा येथे घडली. अक्षय गालफाडे (२७) आणि पत्नी शुभांगी (२१) अशी मृतांची नावं आहेत. दोघांच्या पार्थिाववर गुरुवारी अंत्यविधी करण्यात आले.किरकोळ वादातून नवविवाहित दाम्पत्यानं आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील केतुरा येथे घडली. अक्षय गालफाडे (२७) आणि पत्नी शुभांगी (२१) अशी मृतांची नावं आहेत. दोघांच्या पार्थिाववर गुरुवारी अंत्यविधी करण्यात आले. नवदाम्पत्याच्या निधनानं कुटुंबियांना धक्का बसला असून गावावर शोककळा पसरली आहे.केतुरा येथील अक्षय गालफाडेचा विवाह जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील शुभांगीसोबत ४० दिवसांपूर्वी झाला. लग्नासाठी काढलेली सुट्टी संपल्यावर अक्षय पुण्याला निघून गेला. तिथे तो लाईट फिटिंगचं काम करायचा. नुकताच तो गावाकडे आला होता. बुधवारी म्हणजेच २ एप्रिलला तो पुन्हा पुण्याला जाण्यास निघाला.










