व्हिडिओ कॉल करुन पत्नीचा गळफास, पतीनंही जीव दिला; लग्नानंतर ४० दिवसांनी जोडप्यानं जीवन संपवलं.

किरकोळ वादातून नवविवाहित दाम्पत्यानं आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील केतुरा येथे घडली. अक्षय गालफाडे (२७) आणि पत्नी शुभांगी (२१) अशी मृतांची नावं आहेत. दोघांच्या पार्थिाववर गुरुवारी अंत्यविधी करण्यात आले.किरकोळ वादातून नवविवाहित दाम्पत्यानं आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील केतुरा येथे घडली. अक्षय गालफाडे (२७) आणि पत्नी शुभांगी (२१) अशी मृतांची नावं आहेत. दोघांच्या पार्थिाववर गुरुवारी अंत्यविधी करण्यात आले. नवदाम्पत्याच्या निधनानं कुटुंबियांना धक्का बसला असून गावावर शोककळा पसरली आहे.केतुरा येथील अक्षय गालफाडेचा विवाह जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील शुभांगीसोबत ४० दिवसांपूर्वी झाला. लग्नासाठी काढलेली सुट्टी संपल्यावर अक्षय पुण्याला निघून गेला. तिथे तो लाईट फिटिंगचं काम करायचा. नुकताच तो गावाकडे आला होता. बुधवारी म्हणजेच २ एप्रिलला तो पुन्हा पुण्याला जाण्यास निघाला.

मलाही सोबत न्या, असा हट्ट शुभांगीनं पुण्याला निघालेल्या अक्षयकडे धरला. त्यावर पुण्यात भाड्यानं खोली घेतो आणि मग तुला सोबत नेतो, अशा शब्दांत अक्षयनं शुभांगीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण शुभांगी ऐकायला तयार नव्हती. सोबत नेलं नाही, तर जीव देईन, अशी थेट धमकी देत तिनं दिली. शुभांगी टोकाचं पाऊल उचलणार नाही, असं अक्षयला वाटत होतं. त्यामुळे शुभांगीला मागे सोडून तो पुण्याला जाण्यासाठी घरातून निघाला.अक्षय बसमधून पुण्याला जाण्यास निघालेला असताना शुभांगीनं त्याला व्हिडीओ कॉल केला. त्यावेळी अक्षय नवगण राजुरीजवळ पोहोचला होता. शुभांगीनं अक्षयला व्हिडीओ कॉल करुन गळफास लावून घेतला. यानंतर अक्षय तातडीनं माघारी फिरला. शुभांगीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात सुरु असताना दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांमध्ये वाद झाले. शुभांगीच्या कुटुंबियांनी आक्रमक पवित्रा घेतला.शुभांगीनं केलेली आत्महत्या, त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे तणावाखाली आलेल्या अक्षयनं शेतात जाऊन गळफास घेतला. या प्रकरणाची नोंद बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. गुरुवारी दुपारी अक्षय आणि शुभांगी यांच्या पार्थिवावर केतुरा गावात अंत्यविधी करण्यात आले. एकाच चितेवर दोघांचे अंत्यसंस्कार पार पडले. अक्षयच्या कुटुंबियांनी त्याच्या मृत्यूपश्चात नेत्रदान केलं. नवदाम्पत्यानं केलेल्या आत्महत्येनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    26/11 हल्ल्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात, माधव भांडारींनी आधी खळबळ उडवली, आता म्हणतात, सरकारला 5 महिने आधीच…

     हेडली का पळून गेला किंवा इतर सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यावेळेस असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारने दिली पाहिजेत” असं माधव भांडारी म्हणाले.मुंबईवर झालेल्या हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात होता. स्थानिक प्रशासनावर…

    देवदर्शनाला जात असताना भाविकाचा रस्त्यातच मृत्यू.

    भडगाव : वृंदावन, मथुरा यात्रेसाठी निघालेल्या भाविकाचा रस्त्यातच मृत्यू झाला. या घटनेमुळे गुढे येथील बाविस्कर कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.भडगाव तालुक्यतील गुढे येथील मूळ रहिवासी आणि बोईसर येथे आरती ड्रग्स…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    26/11 हल्ल्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात, माधव भांडारींनी आधी खळबळ उडवली, आता म्हणतात, सरकारला 5 महिने आधीच…

    26/11 हल्ल्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात, माधव भांडारींनी आधी खळबळ उडवली, आता म्हणतात, सरकारला 5 महिने आधीच…

    देवदर्शनाला जात असताना भाविकाचा रस्त्यातच मृत्यू.

    देवदर्शनाला जात असताना भाविकाचा रस्त्यातच मृत्यू.

    चिमुकला साचलेल्या पाण्यात पडला, वीजेचा शॉक लागून होत्याचं नव्हतं झालं असतं; तेवढ्यात तरुण देवासारखा धावला अन्… Video पाहून सर्वच थक्क.

    चिमुकला साचलेल्या पाण्यात पडला, वीजेचा शॉक लागून होत्याचं नव्हतं झालं असतं; तेवढ्यात तरुण देवासारखा धावला अन्…  Video पाहून सर्वच थक्क.

    आई-वडील कामावर, घरात असं काय घडलं, की….तेरा वर्षाच्या भावाने सात वर्षाच्या लहान बहिणीला संपवलं; कारण हैराण करणारं.

    आई-वडील कामावर, घरात असं काय घडलं, की….तेरा वर्षाच्या भावाने सात वर्षाच्या लहान बहिणीला संपवलं; कारण हैराण करणारं.