राजपूत समाजासाठी “महाराणा प्रतापसिह आर्थिक विकास महामंडळ” स्थापन करा

राजपूत समाजासाठी “महाराणा प्रतापसिह आर्थिक विकास महामंडळ” स्थापन करा
डॉ संभाजीराजे पाटील यांचे उपमुख्यमंत्र्यांची निवेदनाद्वारे मागणी

पारोळा प्रतिनिधी ; वाल्मीक पाटील. महाराष्ट्र राज्यातील राजपूत समाज हा आर्थिक दृष्ट्या मागास असून शेती किंवा छोटे उद्योग , व्यवसाय करून आपली उपजीविका करीत असतो. यासाठी मागील वर्षी संभाजीनगर येथे झालेल्या समस्त राजपूत समाज मेळाव्याप्रसंगी मा. मुख्यमंत्री यांनी या समाजाच्या सहकार्यासाठी “महाराणा प्रतापसिह आर्थिक विकास महामंडळ” स्थापन करण्याची घोषणा देखील केली होती.
या अनुषंगाने सुरू अर्थसंकल्पात महामंडळ स्थापनेचा निर्णय करून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या समस्त राजपूत समाजाला दिलासा द्यावा यासाठी डॉ संभाजीराजे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेऊन राजपूत समाजाच्या समस्या सविस्तर मांडून आर्थिक महामंडळ लवकर तसेच याच आधिवेशनात व्हावे ही मागणी केली. या महामंडळ मुळे समस्त महाराष्ट्रभरातील राजपूत समाजाला मोठा दिलासा मिळेल. याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक अरविंद मानकरी , धरणगाव रांका तालुकाध्यक्ष बाप्पुसाहेब आर आर पाटील.

या मागणीच्या पाठपुराव्यासाठी जिल्यातील पालकमंत्री गुलाबरावजी पाटील तसेच मदत पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांची डॉ संभाजीराजे पाटील भेट घेण्यात आली यांच्या निवेदनाची दखल घेत शासन लवकरच महामंडळ स्थापने बाबत योग्य पाऊल उचलेल असे आश्वासित करण्यात आले

डॉ संभाजीराजे पाटील ऍक्टिव्ह मोड वर.
कालच राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे त्या पार्श्वभूमीवर नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सामील झालेले डॉ संभाजीराजे पाटील आपल्या मतदार संघासाठी ऍक्टिव्ह मोड वर काम करताना दिसत आहे. नुकतेच सिंचन प्रकल्पासाठी भेट घेत त्यांनी निवेदन सादर केले होते त्याचबरोबर आता इतर मागण्यासाठी चे निवेदन देऊन पुन्हा ऍक्टिव्ह मोड वर दिसत आहेत.

  • Related Posts

    पोत मंत्रवून देतो म्हणत वृद्ध महिलेची सोन्याची पोत लांबविली !

    पोत मंत्रवून देतो असे म्हणत दोघांनी मुलाकडे जात असलेल्या कस्तुरबाई लक्ष्मण पाटील (वय ६०, रा. जामनेगाव, ता. पाचोरा) या वृद्ध महिलेला रस्त्यात थांबवले. त्यानंतर दोघांनी वृद्धेला गळ्यातील पोत काढण्यास सांगत…

    काजूच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह.!

    दिनांक १ एप्रिल २०२५, मंगळवार रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग तालुक्यातील विर्डी गावात सोशल मीडियावरील एका ग्रुपवर काजू बागेत मृतदेह असल्याचा एक मेसेज पडला आणि गावात कुजबुज सुरु झाली.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    गाढ झोपेत असताना अचानक स्फोटाचा आवाज, आकाशातून कोसळला धातूचा तुकडा, नागपुरात खळबळ.

    गाढ झोपेत असताना अचानक स्फोटाचा आवाज, आकाशातून कोसळला धातूचा तुकडा, नागपुरात खळबळ.

    कुटुंबासोबत वॉटर पार्कला गेली ती परत आलीच नाही; एक चूक आणि होत्याचं नव्हतं झालं, काय घडलं?

    कुटुंबासोबत वॉटर पार्कला गेली ती परत आलीच नाही; एक चूक आणि होत्याचं नव्हतं झालं, काय घडलं?

    ‘फडणवीसांच्या कटकारस्थानामुळे थोपटे…’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा खळबळजनक दावा.

    ‘फडणवीसांच्या कटकारस्थानामुळे थोपटे…’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा खळबळजनक दावा.

    संशयाने संसाराची राखरांगोळी! आधी पत्नीला संपवलं, चौकशीसाठी बोलविलेल्या पतीने पोलिस ठाण्यातच… पुणे हादरलं.

    संशयाने संसाराची राखरांगोळी! आधी पत्नीला संपवलं, चौकशीसाठी बोलविलेल्या पतीने पोलिस ठाण्यातच… पुणे हादरलं.