आईची कॅन्सरशी झुंज, मुलगी दहावीला राज्यात पहिली, तिचं स्वप्न ऐकून येईल डोळ्यांत पाणी.

 आई कॅन्सरशी झुंज देतेय. तिला होणारा त्रास तिचं कुटुंब अनुभवतंय. कुटुंबाकडून तिला या त्रासातून काढण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले जात आहेत. या संघर्षात कुटुंबाची प्रचंड ससेहोलपट होत आहे. हे सारं दहावीचं शिक्षण घेणारी घरातील मुलगी पाहत आहे. ती सारं काही अनुभवत आहे. पण या भयानक अडचणीतून बाहेर निघायचं असेल तर शिक्षण आणि मेहनतीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मुलगी प्रचंड जिद्दीने अभ्यास करते. ती इतका अभ्यास करते की, बोर्डात पहिली येते. यानंतर या विद्यार्थिनीने जी प्रतिक्रिया दिली ती खरंच काळजाल भिडणारी आहे. तिचं स्वप्न ऐकून आपल्यादेखील डोळ्यांत पाणी येईल.यशस्वी होणाऱ्या माणसांच्या पाठिमागे त्यांचा संघर्ष असतो. प्रत्येकाची एक भावनिक गोष्ट असते. ही भावनिक गोष्ट समाजालादेखील प्रेरित करत असते. बिहारच्या दहावीच्या बोर्डात पहिल्या आलेल्या विद्यार्थिनीचं वैयक्तिक आयुष्यदेखील खूप प्रेरणादायी आहे.

तिचा प्रवास पाहिल्यानंतर, तिचं मत ऐकल्यानंतर माणसं सहज मोठी होत नाहीत, ती त्यांच्या कृर्तृत्वाने, भवतालच्या परिस्थितीने आणि त्यांच्या जिद्दीमुळे मोठी होतात हे स्पष्ट होतं. या विद्यार्थिनीने बोर्डात पहिला क्रमांक पटकावला. तिला डॉक्टर व्हायचं आहे. कारण तिची आई सध्या कॅन्सर आजाराशी झुंज देत आहेत. आईचा अवस्था पाहून कॅन्सग्रस्त रुग्णांना किती त्रास सहन करावा लागतो याची जाणीव या विद्यार्थिनील आहे. त्यामुळेअशा आजाराच्या पीडित रुग्णांच्या सेवेसाठी स्वत:ला वाहून घ्यावं या ध्येयासाठी विद्यार्थिनीला डॉक्टर व्हायचं आहे.बिहारच्या दहावी बोर्डाच्या परीक्षेत अंशू कुमारी नावाच्या विद्यार्थिनीने पहिला क्रमांक पटकावला आहे. 26 वर्षीय अंशूने दहावीच्या बोर्डात पहिला क्रमांक पटकावल्याने तिचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. फक्त पहिला क्रमांक पटकावल्यामुळे नाही तर तिच्या या जिद्दीमागे तिने सांगितलेल्या कारणामुळेदेखील ती चर्चेत आहे. तिला कॅन्सरग्रस्त रुग्णांची मदत करायची आहे. त्यामुळे ती जिद्दीने अभ्यास करत आहे. अंशूच्या आईलादेखील कॅन्सरच निदान झालं आहे. कॅन्सरग्रस्तांना होणारा त्रास ती जवळून अनुभवत असल्यामुळे तिने डॉक्टर बनण्याचा निर्णय घेतला आहे.अंशू कुमारी हिने बोर्डात 489 गुण म्हणजेच 97.80 टक्के गुण मिळवले आहेत. अंशूने सांगितलं की, मला डॉक्टर बनावयचं आहे. तिच्या या स्वप्नामागेदेखील एक भावनिक कारण आहे. तिच्या या यशानंतर माध्यमांना तिची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने खूप सुंदर प्रतिक्रिया दिली.”माझं लक्ष्य हे कधी परीक्षेत पहिला क्रमांक पटकवण्याचं कधीच नव्हतं. मला परीक्षेत फक्त चांगले गुण मिळवायचे होते. माझ्या कुटुंबासाठी एक काळ खूप वाईट होता. माझी आई सबिता देवी ही कॅन्सरने पीडित आहे. आम्हाला भावनात्मक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. शिक्षण आणि प्रचंड मेहनत हेच आमच्या लढाईचे चांगले मार्ग आहेत याची जाणीव मला झाली. मला डॉक्टर (ऑन्कोलॉजिस्ट) बनायचं आहे. कारण माझी देखील कॅन्सरची पीडित आहे”, अशी प्रतिक्रिया अंशूने दिली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.