सत्तेचा उपयोग कुटुंब पोसण्यासाठी केला; अमित शहांची लालूप्रसाद यादव यांच्यावर घणाघाती टीका.

काँग्रेस आणि इतर पक्षांनी जेवढी कामे केली आहेत, त्यापेक्षा जास्त काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दहा वर्षांत देशासह राज्यात केले आहे,’ असे शहा म्हणाले.‘राज्यात १५ वर्षे लालू-राबडीदेवी यांचे सरकार होते. डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये लालू मंत्री होते; परंतु बिहारच्या विकासासाठी त्यांनी काय केले? काँग्रेस आणि इतर पक्षांनी जेवढी कामे केली आहेत, त्यापेक्षा जास्त काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दहा वर्षांत देशासह राज्यात केले आहे,’ असे शहा म्हणाले.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचा गृहजिल्हा असलेल्या गोपालगंजला भेट दिली. राज्यात यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी लालूप्रसाद यादव यांना जोरदार लक्ष्य करत त्यांच्या कार्यकाळात राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले; तसेच त्यांनी सत्तेचा उपयोग कुटुंब पोसण्यासाठी केला, असा घणाघाती आरोपही केला.

अमित शहा म्हणाले, ‘लालूप्रसाद यादव यांनी आपल्या राजवटीत बिहारमधील तरुणांना रोजगार देण्याऐवजी आपले कुटुंब पोसण्यावर भर दिला. त्यांच्या काळात अनेक घोटोळे झाले. त्यांची दोन्ही मुले आधी मंत्री झाली आणि आता मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहत आहेत. एक मुलगी खासदार आहे, तर दुसऱ्या मुलीने लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्याआधी त्यांची पत्नी राबडीदेवी यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. राबडीदेवी यांचे दोन्ही भाऊ मंत्री झाले आणि वहिनीलाही नेता करण्यात आले. यामुळे त्यांचे सर्व कुटुंब राजकारणात असून, ‘सेट’ झाले आहे; परंतु यातील कोणीही बिहारच्या तरुणाईला सक्षम करू शकले नाही.

’‘पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील तरुणांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम करीत आहेत. बिहारमध्ये याच वर्षी निवडणुका होणार आहेत. लालू-राबडीदेवी यांच्या जंगलराजकडे जायचे की मोदी आणि नितीशकुमार यांच्या विकासाच्या वाटेवर जायचे हे बिहारच्या नागरिकांनी ठरवायचे आहे. बिहारमध्ये भाजप-एनडीए सरकार सत्तेवर आल्यापासून विकासाला सुरुवात झाली आहे,’ असे शहा म्हणाले. आगामी निवडणुकीत भाजपला संधी दिल्यास बिहारला भेडसावणाऱ्या पुराच्या समस्येतून कायमचा मार्ग काढण्यात येईल. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे स्वप्न लोक वर्षानुवर्षे पाहत होते. ‘लालू अँड कंपनी’ने यामध्ये अनेक अडथळे आणले; परंतु आम्ही प्रभू रामाचे भव्य मंदिर बांधले. आता बिहारमध्ये माता सीतेचे भव्य मंदिर बांधले जाणार आहे, असे शहा म्हणाले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.