दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हाय कोर्टात एक याचिका दाखल करत तिची हत्या झाली असून या प्रकरणाचा नव्याने तपास करण्याची मागणी केली आहे. त्यांनी या याचिकेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंवरही गंभीर आरोप केले आहेत.‘शिवसेनाप्रमुखांचे नातू आदित्य ठाकरे यांच्यावर बलात्काराचा आरोप होणे ही गंभीर बाब आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना थोडीशी जरी लाज असती तर ते देश सोडून गेले असते’, अशी बोचरी टीका शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी गुरुवारी केली. पोलिसांना हाताशी धरून उध्दव ठाकरेंनी पुरावे नष्ट केले आहेत का याची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.दिशा सालियन प्रकरणाच्या पुनर्चौकशीसाठी तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने आता या प्रकरणावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ‘आदित्य ठाकरे यांचा दिशा सालियन प्रकरणात संबंध असल्याचे नारायण राणे सुरुवातीपासूनच बोलत होते. पण दुर्दैवाने ते पुरावे देऊ शकले नाहीत.










