थोडीशी लाज असती तर आदित्य ठाकरे.., दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन रामदास कदमांची बोचरी टीका.

 दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हाय कोर्टात एक याचिका दाखल करत तिची हत्या झाली असून या प्रकरणाचा नव्याने तपास करण्याची मागणी केली आहे. त्यांनी या याचिकेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंवरही गंभीर आरोप केले आहेत.‘शिवसेनाप्रमुखांचे नातू आदित्य ठाकरे यांच्यावर बलात्काराचा आरोप होणे ही गंभीर बाब आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना थोडीशी जरी लाज असती तर ते देश सोडून गेले असते’, अशी बोचरी टीका शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी गुरुवारी केली. पोलिसांना हाताशी धरून उध्दव ठाकरेंनी पुरावे नष्ट केले आहेत का याची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.दिशा सालियन प्रकरणाच्या पुनर्चौकशीसाठी तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने आता या प्रकरणावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ‘आदित्य ठाकरे यांचा दिशा सालियन प्रकरणात संबंध असल्याचे नारायण राणे सुरुवातीपासूनच बोलत होते. पण दुर्दैवाने ते पुरावे देऊ शकले नाहीत.

ज्या मुलींच्या संरक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी कडक भूमिका घेतली, त्यांचा मुलगा आणि नातवावर असे आरोप होत असतील तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी करण्यासंदर्भात तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. न्यायालयाने चौकशीचा आदेश दिला तर याचा खोलवर तपास होईल’, असे कदम म्हणाले.‘दिशा सालियनच्या विषयात काहीही तथ्य नाही. मात्र, तुम्ही खोट्याचा नायटा करणार असाल तर तुमच्यावरच बूमरँग होईल’, असा इशारा शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सत्ताधाऱ्यांना दिला.दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरही यानिमित्ताने निशाणा साधला आहे. साहजिकच यावरून सत्ताधाऱ्यांनी विधिमंडळाच्या सभागृहात आदित्य ठाकरे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर सभागृहाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी हा इशारा दिला. ते म्हणाले, ‘आमच्या घराण्याच्या सहा-सात पिढ्या जनतेसमोर आहेत. त्यामुळे या गोष्टींमध्ये काहीही तथ्य नाही. पण राजकारण वाईट दिशेला न्यायचे असेल, तर मग सगळ्यांचीच पंचाईत होईल. दिशा सालियनच्या विषयात तथ्य नाही, दूर-दूरपर्यंत आमचा संबंध नाही. खोट्याचा नायटा कराल तर तुमच्यावरच बूमरँग होईल हेच या लोकांना मी सांगू इच्छितो.’या प्रकरणावर आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली. ‘गेल्या पाच वर्षांपासून हे चालू आहे. न्यायालयात जे होईल ते होईल. मी एकच सांगेन की, गेली पाच वर्षे बदनामीचा प्रयत्न सातत्याने होत आहे. त्यामुळे आता जे काही बोलायचे आहे ते न्यायालयात बोलेन’, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.