कोकणात पारंपरिक पिकांना बगल देत सेंद्रीय बटाट्याची लागवड, शेतीतून साधली आर्थिक प्रगती, ३ महिन्यात हजारोंचं उत्पन्न.

कोकणात आंबा, काजू, भात या पारंपरिक पिकाला बगल देत एका प्रगतीशील शेतकऱ्याने सेंद्रीय बटाट्याची यशस्वी शेती केली आहे. यातून त्यांनी चांगली आर्थिक प्रगतीही साधली आहे.कोकणात विशेषतः भात, नाचणी, आंबा, काजू ही पिकं घेतली जातात. मात्र अलीकडे आंबा, काजू ही फळ बागायती लहरी हवामानामुळे बेभरवशी झाली आहे. त्यामुळे शेतात नवनवीन प्रयोग करण्याची गरज आहे. त्यातूनच येथील शेतकऱ्यांनी बटाटा लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. बटाट्याचे पीकही कोकणात यशस्वी होऊ शकतं, हेच यातून त्यांनी दाखवून दिलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आडे येथील प्रसाद कोकणे या प्रयोगशील शेतकऱ्याने पंधरा गुंठ्यात बटाट्याची लागवड करून उत्तम आर्थिक नफा मिळू शकतो याचे उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे. कोकणात कडधान्य, डाळी, कांदे, बटाटे हे उर्वरित महाराष्ट्रातून येतं, पण कोकणात केवळ भात पिकानंतर भाजीपाला न घेता त्यामध्ये बटाट्यासारखं पीकही कोकणात यशस्वी करून दाखवण्याची किमया या प्रयोगशील शेतकऱ्याने साधली आहे.मेहनतीच्या जोरावर आडे येथील प्रसाद कोकणे यांनी बटाट्याची यशस्वी शेती केली आहे. हा त्यांचा कृषीविषयक आदर्श येथील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारा आहे.

दापोली शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या आडे येथील प्रयोगशील शेतकरी प्रसाद कोकणे हे आपल्या वडिलोपार्जित शेतीत दरवर्षी रब्बी हंगामात कोबी, मिरची, टोमॅटो, पालक, कोथंबिर, मेथी, मुळा अशा भाजीपाल्यासह झेंडू फुलांची लागवड देखील ते करतात. यातून त्यांनी यशस्वी शेती केली आहे. अशा या शेतकऱ्याने दुर्दम्य इच्छाशक्तीने आपल्या पूर्व अनुभवाच्या जोरावर यावर्षी रब्बी हंगामात चक्क बटाटा लागवड करण्याचं ठरवलं आणि त्यात ते कमालीचे यशस्वी झाले. शेतीत नवनवीन प्रयोग करणारे प्रसाद कोकणे यांना प्रगतिशील शेतकरी म्हणून यापूर्वी गौरवण्यात आलं आहे. शेती बागायतीत नवनवीन प्रयोग करून ते यशस्वी करण्यात त्यांचा हातखंडा आहे.शाकाहारी असो की मांसाहारी प्रत्येकाचा बटाटा आवडता असतो. जगभरातील नागरिकांच्या आहारातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे बटाटा. बटाटा हा बहुगुणी, आरोग्यदायी, अनेक औषधी फायदे असणारा आहे. अशा या बटाटा पिकाची लागवड आडे येथील प्रसाद कोकणे यांनी केली आहे. आपल्या वडिलोपार्जित २२ गुंठ्यातील १५ गुंठे क्षेत्रात त्यांनी १० फुट लांबीचं २२५ सरी वाफ्पे तयार करून त्या वाफ्यामध्ये २९ नोव्हेंबर २०२४ रोजी बटाटा पिकाची लागवड केली.

संपूर्ण सेंद्रिय खताने तयार केलेल्या या लागवडीसाठी त्यांनी सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथून पुरवराज बटाटयाचं बियाणं आणून लावलं होतं.लागवडीनंतर ९० दिवसांनी म्हणजेच १ मार्च २०२५ पासून बटाटा पिक काढण्यास त्यांनी सुरूवात केली. मेहनतीच्या जोरावर १५ गुंठ्यात त्यांनी तब्बल अडीच टन उत्तम प्रतीच्या बटाटा पिकाचं उत्पादन घेतलं. सेंद्रिय खताच्या मात्रेने तयार करण्यात आलेल्या या बटाटयाचा प्रती किलो दर ४० रुपये आहे. सेंद्रिय बटाटा म्हणून चोखंदळ ग्राहकांनी बटाटा खरेदीसाठी केलेली मागणी पाहता अडीच टन बटाटयाची विक्री होणार हे नक्की.दर १२ दिवसांनी बटाटा पिकाला पाणी घातलं जात होतं. यासाठी केळशी येथील प्रगतशील शेतकरी आणि विविध लागवडीची शास्त्रोक्त माहिती असलेले एक यशस्वी शेतकरी उदय जोशी यांनी प्रसाद कोकणे यांना मार्गदर्शन केलं होतं. प्रसाद कोकणे हे आपले इतर उदयोग सांभाळत शेतीची आवड जोपासत आहेत. ते विविध प्रकारचा भाजीपाला करतात, त्यात आता बटाटा पिकाच्या उत्पादनाच्या आणखी एका पिकाची भर पडली आहे.शेती पिकाचं वन्य प्राण्यांकडून नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी पत्रा लावून संपूर्ण शिवाराला कुंपण घातलं आहे. दापोलीत विविध प्रकारची पिकं उत्तम होतात. येथील शेतकऱ्यांनी अशी विविध प्रकारची पिकं घेतली तर आपल्याला दुसऱ्या भागावर अवलंबून राहावं लागणार नाही, अशी उत्तम शेती आपल्या येथे होते अशी प्रतिक्रिया प्रयोगशील शेतकरी प्रसाद कोकणे यांनी दिली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.