औरंगजेबाच्या कबरीबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं सर्वात मोठं वक्तव्य, औरंग्याच्या थडग्याला संरक्षण का? मुख्यमंत्री म्हणाले…

“ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं. त्याच्याच कबरीचे संरक्षण आम्हाला करावं लागत आहे”, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. देवेंद्र फडणवीस यांनी यामागील कारण देखील सांगितलं आहे. “या देशामध्ये महिमा मंडळ होईल तर ते फक्त छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं होईल. औरंजेबाच्या कबरीचा होणार नाही. दुर्दैव आहे की 50 वर्षांपूर्वी औरंगजेबाच्या कबरीस संरक्षित स्थळ घोषित केल्याने त्याच्या रक्षणाची जबाबदारी शासनाची आहे. ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं. त्याच्याच कबरीचे संरक्षण आम्हाला करावं लागत आहे”, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते भिवंडी तालुक्यातील मारडे पाडा येथे छत्रपती शिवरायांच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.”एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो, काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडळ प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही.

हे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर आपल्या सर्वांना मी देतो. अतिशय सुंदर अशा प्रकारचे महाराजांचे मंदिर या ठिकाणी तयार केले आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.”या देशातील आपल्या इष्ट देवतांचे मंदिरात जाऊन पूजन आपण करू शकलो ते शिवरायांमुळे. देव, देश आणि धर्मासाठी लढा देत त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. जसे हनुमानाचं दर्शन घेतल्याशिवाय प्रभू श्रीरामांचे दर्शन पूर्ण होत नाही. तसं छत्रपती शिवरायांच्या दर्शनाशिवाय कुठल्याच देवाचे दर्शन पूर्ण होणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.”देव, देश आणि धर्माकरता रयतेचे राज्य स्थापन झालं पाहिजे, अशा प्रकारच्या विचारातून आई जिजाऊंनी शिवबांना घडवलं आणि शिवबांनी चमत्कार केला. नव्या युगाची निर्मिती करणारे प्रभू श्रीराम यांच्याकरता युगपुरुष आहेत. तसेच छत्रपती शिवरायांनी देखील त्या ठिकाणी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं. त्यांनी कधी लढण्याचा विचारही केला नव्हता, अशा लोकांना एकत्रित केलं. शेतकरी, शेतमजूर, 12 बलुतेदार असे छोटे-छोटे लोक हे सगळे एकत्रित केले आणि त्यांच्यामध्ये पुरुषत्व निर्माण केलं”, असं देवेंद्र फडणीस म्हणाले.”छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले जागतिक वारसास्थळ म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडून युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवला आहे. छत्रपती संभाजी राजे यांना ज्याठिकाणी कपटाने पकडले तो संगमेश्वर येथील वाडा देखील राज्य सरकार ताब्यात घेऊन त्याचा विकास करणार आहे. तर उत्तर प्रदेश सरकारला विनंती करून आग्रा किल्ल्यावरील शिवाजी महाराजांना अटक करून ठेवलेली कोठडी स्मारकासाठी राज्य  सरकारच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परिसरातील रस्त्यांच्या बांधणीसाठी निधी देणार”, अशीदेखील घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.