सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिल्हा राज्यभरात चर्चेत आला. या संपूर्ण प्रकरणाला पुढे जातीयवादाचा रंग मिळाला. देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा विषय भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी सातत्यानं लावून धरला.बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिल्हा राज्यभरात चर्चेत आला. या संपूर्ण प्रकरणाला पुढे जातीयवादाचा रंग मिळाला. देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा विषय भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी सातत्यानं लावून धरला. बीड जिल्ह्याच्या पोलीस दलातील बिंदू नामावलीचा मुद्दा धस यांनीच उपस्थित केला होता. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार केला. जिल्ह्यातील पोलीस दलात एकाच जातीचं वर्चस्व असल्याचं धस यांनी सांगितलं होतं. पोलीस दलातील अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मर्जीतील असल्याचा विषयदेखील धस यांनीच समोर आणला.










