‘महाराष्ट्रातील सगळ्या जमिनीची पुनर्मोजणी करावी’; ९ दिवसांपासून शेतकऱ्याचं आमरण उपोषण.

 महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील शेतकरी कांतीलाल गिऱ्हे ९ दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. जमिनींची पुनर्मोजणी आणि रस्ते सर्वे यांसारख्या मागण्यांसाठी ते उपोषणास बसले आहेत. प्रशासनाने अद्याप त्यांचे मागण्या मान्य केल्या नाहीत. यापूर्वी दिलेले लेखी आश्वासनही पूर्ण झाले नाही, असा आरोप गिऱ्हे यांनी केला.महाराष्ट्रातील बीड जिल्हा संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत आहे. या प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. याच जिल्ह्यतील एका शेतकरी गेल्या ९ दिवसांपासून उपोषण करत आहे. याच्याकडे कोणीही लक्ष देताना दिसत नाही. महाराष्ट्र सरकारने पुन्हा जमिनीची पुनर्मोजणी करण्याच्या मागणीसाठी त्यांचे उपोषण सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्याकडे ही मागणी केली आहे. कांतीलाल गिऱ्हे असं त्यांचे नाव आहे.

महाराष्ट्र सरकारने पुन्हा जमिनीची पुनर्मोजणी करावी आणि गावठाण व शिवरस्ते सर्वे नंबर हे सरकार तर्फे रोड बजेट टाकून तयार करण्यात यावेत यासाठी सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल गिऱ्हे हे 3 मार्च 2025 पासून आमरण उपोषणास बसले आहेत. उपोषणाचा आज 9 वा दिवस आहे. राज्य सरकार या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करत नाही तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही, असा पवित्रा उपोषणकर्ते कांतीलाल गिऱ्हे यांनी घेतला आहे. याआधी देखील याच मागण्यासाठी गिऱ्हे यांनी उपोषण केले होते. त्यावेळी आष्टी ,पाटोदा तालुक्यातील जमिनींची तीन महिन्यांमध्ये मोजणी करण्यात येईल, असं लेखी आश्वासन उप- अधीक्षक प्रमोद कुदळे यांनी दिले होते. तसेच यासंदर्भात जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांना स्मरण पत्र देखील दिले होते, असं कांतीलाल गिऱ्हे यांनी सांगितले. प्रशासनाकडून तहसीलदार आणि तलाठी यांनी भेट घेतली आहे. वरिष्ठ पातळीवर या संदर्भात पाठपुरावा सुरू असल्याचे उत्तर त्यांनी दिले आहे, असंही त्यांनी म्हटलं. 1) संपूर्ण महाराष्ट्रातील जमिनींची पुनर्मोजणी करावी ,2)गावठाण मोजणी करावी, 3)शिवरस्ते मोजणी करावी , 4) सर्वे नंबर रस्ते मोजणी करावी दरम्यान, महाराष्ट्र शासनाने पुन्हा 1930 सारखी जमिनीची पूर्वीप्रमाणे मोजणी करावी. यामुळे राज्यातील सर्व पीडित जनतेस न्याय मिळेल. महाराष्ट्र शासनाने पुन्हा संयुक्त मोजणी महसूल अधिनियम नुसार करावी, अशी आग्रही मागणी कांतीलाल गिऱ्हे यांनी केली आहे. उपोषण स्थळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी भेट दिली. तसेच आष्टी तालुका काँग्रेस अध्यक्ष रवी काका ढोबळे यांनी भेट दिली आहे. कांतीलाल गिऱ्हे यांच्या उपोषणाची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात, अशी भूमिका समस्त ग्रामस्थ निमगाव चोभा यांनी घेतली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.