छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या गुणकथा, पराक्रम आणि इतिहास घराघरात पोहोचवण्यासाठी यशोगाथा अकॅडमीच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील महाराजांच्या जयंतीनिमित्त भरवलेल्या या परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि “जय भवानी! जय शिवाजी!” या गर्जनांनी करण्यात आली.

यावेळी उपस्थितांचे उत्साहपूर्ण प्रतिसादाने संपूर्ण वातावरण शिवमय झाले. स्पर्धेमध्ये दोन गटांमध्ये एकूण 680 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.प्रथम गट (इयत्ता चौथी ते सहावी) : 345 विद्यार्थी मोठा गट (इयत्ता सातवी ते नववी) : 335 विद्यार्थी स्पर्धा 50 गुणांच्या बहुत पर्याय स्वरूपातील प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून झाली. या परीक्षेतील सर्व प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर, कार्यावर आणि इतिहासावर आधारित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशोगाथा अकॅडमीचे संस्थापक उमेश धनगर सर होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरोजिनी मॅडम येवले यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू सुरणार सर, अभिजीत तायडे सर, सगुना महाजन मॅडम, खुशबू पाटील मॅडम, भूषण धनगर, कमलेश शिर्के, पवन कोळी, धीरज तायडे, श्याम निळे यांनी विशेष परिश्रम घेतले.गेल्या तीन वर्षांपासून यशोगाथा अकॅडमी ही स्पर्धा सातत्याने आयोजित करत आहे. या उपक्रमामधून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास अधिक चांगल्या प्रकारे समजावा, त्यांच्या पराक्रमातून प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या विचारांचे रोपण तरुण पिढीत व्हावे, हा उद्देश आहे.यशोगाथा अकॅडमीने पुढील वर्षांमध्ये ही स्पर्धा अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला आहे.









