थेंबभर पाण्यासाठी महिला ‘दीन’! आदिवासी महिलांचा एल्गार, नाशिक जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढत आंदोलन.

नाशिकसह इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी महिलांनी शनिवारी (दि. ८) जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या दिला. तत्पूर्वी डोक्यावर रिकामे हंडे घेत त्यांनी भर उन्हात थेंबभर पाण्यासाठी अनवाणी आदिवासी नृत्य करीत प्रशासनाचा निषेध केला.शहरासह जिल्ह्यातील गल्लीबोळात जागतिक महिला दिनाचे कौतुक सोहळे साजरे होत असताना नाशिकसह इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी महिलांनी शनिवारी (दि. ८) जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या दिला. तत्पूर्वी डोक्यावर रिकामे हंडे घेत त्यांनी भर उन्हात थेंबभर पाण्यासाठी अनवाणी आदिवासी नृत्य करीत प्रशासनाचा निषेध केला.जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी सांस्कृतिक अन् क्रीडा महोत्सवात रममाण असताना मैलोन्‌मैल पायपीट करीत आदिवासी वाड्या-पाड्यांमधून या महिला नाशिकमध्ये दाखल झाल्या त्यावेळी आज (शनिवारी) महिला दिन असल्याचे त्यांच्या गावीही नव्हते. ‘आम्ही भीक मागत नाही, हक्काचं थेंबभर पाणी मागतोय’, अशी आर्त हाळी देत तहानलेल्या लेकरांच्या डोक्यावर पदर झाकत या महिलांनी रणरणत्या उन्हातच बसकण मारली.एल्गार कष्टकरी संघटनेच्या नेतृत्त्वाखाली या आदिवासी महिलांच्या हंडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांची चौकशी करण्यात यावी, वगळण्यात आलेले आदिवासी पाडे या योजनेत समाविष्ट करावेत, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व नाशिक तालुक्यांमध्ये जलजीवनची कामे मंद गतीने सुरू आहेत. यातील अपूर्ण योजनांच्या दोषींवर कारवाई करण्यात यावी, पाणीटंचाई असणाऱ्या आदिवासी पाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, वैतरणा धरणातून पाणीपुरवठा करण्यात यावा, या प्रमुख मागण्या महिलांनी केल्या. जि. प. च्या माध्यमातून सुरू असणाऱ्या जलजीवन मिशनची पहिल्या तिनही टप्प्यातील अनेक कामे अद्याप अपूर्ण आहेत. अपूर्ण योजनांच्या कामांची देयके ठेकेदारांना देण्यात येऊ नयेत, या योजनेच्या मुदतीत अंमलबजावणीसाठी कारण ठरलेल्या ग्रामसेवक ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे.मोर्चामध्ये एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे, जिल्हाध्यक्ष भीमा गुंबाडे, सरचिटणीस वसंत इरते, भीमाबाई मागटे, सरूबाई पाडेकर, कमायबाई येरंदे, इंद्राबाई धांडे आदींसह महिलांनी सहभाग घेतला.

आदिवासी तालुक्यांमध्ये सुरू असणाऱ्या जलजीवन मिशन योजनेची कामे ही धीम्या गतीने सुरू असल्याची या आंदोलकांची नाराजी आहे. या योजनेच्या कामांची मुदत उलटून जाऊन तिला मुदतवाढदेखील मिळते मात्र आदिवासी गावे, वाडे-पाडे, आश्रमशाळा अन् अंगणवाड्यांसारखी ठिकाणे थेंबभर पाण्यासाठी दिवस अन् दिवस प्रतीक्षा करतात, हे चित्र सुखवाह नसल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले.नाशिकसह त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यांमध्ये जलजीवन मिशनची कामे अतिशय संथ गतीने सुरू आहेत. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाली. महिलांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ऊन वाढत जाईल तशी स्थिती आणखी बिकट होत जाईल. प्रशासनाने आदिवासी पाड्यांना पाण्यासाठी आश्वस्त करावे.

  • Related Posts

    पथदिव्यांच्या अंधारात मनसेचे, “मोबाईल लाईट आंदोलन…

    पथदिव्यांच्या अंधारात मनसेचे, “मोबाईल लाईट आंदोलन” जळगाव- मोहाडी परिसरातील नव्याने उभारण्यात आलेल्या शासकीय रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथदिव्यांचा पूर्ण अंधार असल्यामुळे रुग्ण, विशेषतः गर्भवती माता आणि त्यांच्या नातेवाईकांना दररोज जीव मुठीत…

    नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला? तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव हा वाळू तस्करांचा मोहल्ला?

    नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला? तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव हा वाळू तस्करांचा मोहल्ला? कोपरगावं तालुक्यातील वाळू माफियानी हद्द पार केली असून या संदर्भात वरिष्ठ पातळीवर दररोज पुराव्या निशी तक्रारी दाखल होत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.