निष्णात डॉक्टर, तीन दशकं रुग्णसेवा, डॉ. शिरीष वळसंगकरांवर टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ का.

सोलापुरातील ख्यातनाम मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात कधीही भरुन न निघणारं नुकसान झालं आहे.ख्यातनाम मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या अकाली निधनाने सोलापुरातील वैद्यक क्षेत्राचेच नव्हे, तर एकूणच समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. डॉ. वळसंगकर यांच्यासारखा तज्ज्ञ आणि निष्णात डॉक्टर हा समाजाचा एक ठेवा असतो. कमालीची गुंतागुंत असलेल्या मेंदूला समजून घेऊन त्याच्याशी संबंधित आजार बरे करणे ही सोपी गोष्ट नाही. मेंदूविज्ञान अजूनही विकसित होत आहे, हेही त्याच्या मागील एक कारण. मात्र, डॉ. वळसंगकर यांनी या विज्ञानात केवळ गतीच प्राप्त केली होती असे नाही, तर तिचा उपयोग करून ते रुग्णांना पुन्हा उभे करीत होते.

तीन दशकांहून अधिक काळ रुग्णसेवा करून डॉ. शिरीष वळसंगकर यांनी वैद्यक क्षेत्रात आपल्या नावाची मुद्रा उमटविली होतीच; परंतु त्याचबरोबर सोलापूरसारख्या मिश्रभाषक शहरातील सामाजिक जीवनातही स्थान कमावले होते. वैद्यकीय क्षेत्राला कमालीचे व्यावसायिक स्वरूप येत असताना, मानवतेला प्राधान्य देऊन रुग्णसेवा करणारे डॉक्टर संख्येने कमी असले, तरी अजूनही आहेत. डॉ. वळसंगकर हे त्यांपैकी एक होते.सोलापुरातच शालेय आणि वैद्यकीय शिक्षण घेऊन त्यांनी कुर्डुवाडी, कोल्हापूर, मुंबई यांसह विविध ठिकाणी रुग्णसेवा केली आणि त्यानंतर परत सोलापुरातच त्यांनी सेवा सुरू केली. मेंदूच्या आजाराशी संबंधित सुविधांसाठी मुंबई, पुणे या शहरांवर अवलंबून असतानाच्या काळात त्यांनी सोलापुरात सुविधा निर्माण केल्या.

त्यामुळे सोलापूरसह शेजारच्या कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांतील रुग्णही त्यांच्याकडे येत. एका छताखाली सर्व वैद्यकीय सुविधा देण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला यश आले आणि त्यांची ख्याती वाढतच गेली.वैद्यक क्षेत्रातील ज्ञान अद्ययावत करण्यावर ते सतत भर देत. जोडीला अन्य नवीन विषयही शिकून घेत. हवाई क्षेत्राचेही आकर्षण त्यांना होते. वैमानिकाचे प्रशिक्षण पूर्ण करून ते उड्डाणेही करीत. त्यांच्यासारख्या बहुमुखी आणि प्रतिभावंत डॉक्टरवर आत्महत्या करण्याची वेळ येणे दुर्दैवी आहे. यामागची कारणे पोलिस शोधतीलच; परंतु त्यांच्यासारख्या डॉक्टरांच्या जाण्याने झालेले नुकसान भरून येणारे नाही. डॉ. वळसंगकर यांना श्रद्धांजली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.