देशातील ‘या’१० महामार्गांवर हायड्रोजनवर बस अन् ट्रक धावणार; ५ पथदर्शी प्रकल्पांना मंजुरी.

 ‘राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन’ ला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने बस आणि ट्रकमध्ये हायड्रोजनचा वापर करून पाच पथदर्शी प्रकल्प सुरू केले आहेत.’राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन’ ला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने बस आणि ट्रकमध्ये हायड्रोजनचा वापर करून पाच पथदर्शी प्रकल्प सुरू केले आहेत. या प्रकल्पांतर्गत देशातील प्रमुख महामार्गावर ‘ग्रीन हायड्रोजन’ चा वापर असलेली वाहने धावणार असून, या मार्गांमध्ये पुणे-मुंबई महामार्गाचा समावेश आहे.नवीनीकरणीय आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाने या मिशनअंतर्गत परिवहन क्षेत्रामध्ये प्रकल्प राबविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्या अंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर त्याची सुरुवात होईल.

सविस्तर छाननीनंतर मंत्रालयाने एकूण ३७ वाहने (बस आणि ट्रक) आणि नऊ हायड्रोजन रिफ्युएलिंग स्टेशनसह पाच पथदर्शी प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. चाचणीसाठी तैनात केल्या जाणाऱ्या वाहनांत १५ हायड्रोजन ‘फ्युएल सेल’ वर आधारित इंजिनवर आधारित वाहनांचा समावेश २२ हायड्रोजन असेल. ही वाहने देशभरातील १० वेगवेगळ्या मार्गावर धावणार आहेत. ग्रेटर नोएडा-दिल्ली-आग्रा, भुवनेश्वर-कोणार्क-पुरी, अहमदाबाद-बडोदा-सुरत, साहिबाबाद-फरिदाबाद-दिल्ली, पुणे-मुंबई, जमशेदपूर-कलिंगनगर, तिरुअनंतपुरम-कोची, कोची-एडापल्ली, जामनगर-अहमदाबाद, विशाखापट्टणम-बय्यावरम या मागाँवर हायड्रोजन वाहनांची चाचणी होईल.टाटा मोटर्स लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, एनटीपीसी, एएनईआरटी, अशोक लेलैंड, एचपीसीएल, बीपीसीएल आणि ‘आयओसीएल’ या प्रमुख कंपन्यांना वरील मार्गावरील प्रकल्प देण्यात आले आहेत, असे नवीनीकरणीय आणि अपारंपरिक ऊर्जा ऊर्जा मंत्रालयाने स्पष्ट केले.

उपलब्ध झालेल्या निवडक प्रकल्पांसाठी सरकारकडून एकूण २०८ कोटी रुपयांचे अर्थसाह्य मिळणार आहे. अंदाजे १८ ते २४ महिने हे प्रकल्प सुरू राहतील. बस आणि ट्रकमधील इंधन म्हणून परिवहन क्षेत्रातील हायड्रोजनच्या वापरासाठी व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य तंत्रज्ञान विकसित करणे आणि हायड्रोजन रिफ्युलिंग स्टेशनसारख्या पायाभूत सुविधांना चालना देणे आदी उद्दिष्टे या प्रकल्पांतर्गत ठेवण्यात आली आहेत.प्रायोगिक तत्त्वावर टप्याटप्प्याने बस आणि ट्रकमध्ये इंधन म्हणून ‘हरित हायड्रोजना’च्या वापरास मदत करणे हेदेखील या मिशनचे एक उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय ‘हरित हायड्रोजन मिशन’ चार जानेवारी २०२३ रोजी सुरू करण्यात आले असून, आर्थिक वर्ष २०२९-३० पर्यंत १९,७४४ कोटी रुपयांचा निधी त्यासाठी खर्च केला जाणार आहे. देशात सुमारे १२५ गिगावॉट अक्षय्य ऊर्जा क्षमतेच्या वाढीसह दर वर्षी किमान पाच एमएमटी (मिलियन मेट्रिक टन) ग्रीन हायड्रोजन उत्पादन क्षमता विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात येणार आहे.भारताने सन २०४७पर्यंत ऊर्जा क्षेत्रात स्वतंत्र होण्याचे ध्येय ठेवले आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी, सर्व आर्थिक क्षेत्रात अक्षय्य ऊर्जेचा वापर वाढवणे आवश्यक आहे. या संक्रमणाला सक्षम करण्यासाठी ‘ग्रीन हायड्रोजन’ हा एक महत्त्वाचा पर्याय मानला जातो. हायड्रोजनचा वापर अक्षय्य ऊर्जेच्या दीर्घकालीन साठवणुकीसाठी, उद्योगात जीवाश्म इंधनाला पर्याय म्हणून, स्वच्छ वाहतुकीसाठी आणि विमान वाहतूक आणि सागरी वाहतुकीसाठीदेखील केला जाऊ शकतो. त्या अंतर्गत वाहनांमध्ये ग्रीन हायड्रोजनाचा वापर प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.