लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जात असलेल्या प्रसार माध्यम क्षेत्रातील प्रश्नावर जनजागृती व्हावी यासाठी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संवाद यात्रा होणार आहे. संवाद ही शांततेच्या मार्गाने प्रामाणिक,सुरक्षीत चर्चा आहे.ज्यामुळे लोकांच्या समस्या मांडणाऱ्या,पत्रकारांचे प्रश्न सरकारला सांगण्याची व पत्रकारांच्या वेदना, समजून घेण्याची संधी प्रदान करणार आहे. ”संवाद ही एक मूलभूत प्रक्रिया आहे. जी थेट वैयक्तिक आणि संस्थात्मक बदल घडवून आणते.पत्रकारितेच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व लोकशाहीच्या बळकटीसाठी पत्रकार संवाद यात्रा निघत आहे. लोकशाहीत माध्यम व्यवस्था सक्षम राहिली तर सामान्य माणसाचा आवाज बुलंद राहील यासाठी समाजातील प्रत्येकाने या संवाद यात्रेत सहभागी व्हावे. आणि ऐतिहासिक क्षणाचे नुसतेचं साक्षीदार न होता भागीदार व्हावे ही विनंती.

प्रविण सपकाळे राज्य कार्याध्यक्ष. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई











