केस ओढायची, नखांनी ओरबाडायची; पत्नीला वैतागलेल्या पतीला दिलासा, लग्नाच्या वर्षभरातच नातं तुटलं

 लग्नाच्या वर्षभरातच एक जोडपं विभक्त झालं आहे. त्यांच्यामध्ये लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच खटगे उडायला लागले होते. केस ओढून नखांनी ओरबाडणाऱ्या पत्नीच्या त्रासाला वैतागून या पतीने क्रूरतेच्या आधारे घटस्फोट मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात दाद मागितली होती.काही पती-पत्नींमधील नातेसंबंध इतके बिघडलेले असतात की, त्यांनी परत एकत्र येणे अशक्य व त्रासदायक असते. अशा प्रकरणांत पती-पत्नींना सहा महिन्यांचा फेरविचाराचा कालावधी देऊन उपयोग होत नाही. काही प्रकरणांत तर पती-पत्नी सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ विभक्त राहत असतात. त्यांच्यामध्ये विभक्त होण्याच्या अटी-शर्ती निश्चित असतील, तर त्यांच्या परस्पर संमतीच्या घटस्फोटाच्या अर्जावर हा ‘कूलिंग ऑफ पीरियड’ वगळण्याची विनंती वकिलांकडून केली जाते.
लग्नाच्या पहिल्या दिवसापासून केस ओढून नखांनी ओरबाडणाऱ्या पत्नीच्या त्रासाला वैतागून क्रूरतेच्या आधारे घटस्फोट मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात दाद मागणाऱ्या पतीला दिलासा मिळाला आहे. पती-पत्नीने परस्पर संमतीने घटस्फोटासाठी केलेल्या अर्जावर कौटुंबिक न्यायालयाने शिक्कामोर्तब केले असून, लग्नानंतर एका वर्षात हे जोडपे कायमचे विभक्त झाले.
सुरेश आणि सविता (दोघांची नावे बदलली आहेत) यांचा विवाह ६ डिसेंबर २०२३ रोजी झाला. सविताला हे लग्न करायचे नव्हते. कुटुंबाच्या दबावामुळे तिने हे लग्न केले. लग्न झाल्यानंतर ही सल तिने सुरेशला बोलून दाखवली. ‘मला तुझ्याशी लग्न करायचे नव्हते; पण घरच्यांनी जबरदस्तीने लग्न लावले. त्यामुळे माझी बहीण सासू-सासऱ्यांना त्रास देते. तसा त्रास मी तुला आणि तुझ्या आई-वडिलांना देणार आहे,’ असे म्हणत तिने पतीचे केस ओढून त्याला नखांनी ओरबाडले. सुरेशने सविताला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, चौदा दिवसांत सविताने माहेर गाठले. तिने नांदायला यावे, यासाठी पतीने आटोकाट प्रयत्न केले, परंतु ते निष्फळ ठरले.अखेर पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने क्रूरतेच्या आधारे घटस्फोट मिळण्यासाठी ॲड. निखिल कुलकर्णी यांच्यामार्फत पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला. त्यावर सुनावणी सुरू असतानाच पती-पत्नीने काही अटींवर परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
पती-पत्नी पुन्हा एकत्र येणे शक्य नसल्याने घटस्फोटाच्या अर्जानंतर दिला जाणारा फेरविचारांचा कालावधी (कूलिंग ऑफ पीरियड) वगळण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. कुलकर्णी यांनी केला. तो ग्राह्य धरून कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश के. व्ही. ठाकूर यांनी हा दावा निकाली काढला.
  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.