परस्त्रीचा मोह झाला,प्रेमविवाह केलेल्या पतीला आपल्या पत्नीचाच विसर पडला

पती किंवा पत्नी घरी नसल्याची संधी साधून एकमेकांच्या घरी जाऊन भेटीपर्यंतचा हा प्रवास शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यापर्यंत पोहोचत आहेत. सुरुवातील कुणालाही प्रेमसंबंधाची कुणकुणही लागू न देण्याची खबरदारी महिला व पुरुष घेत असतो. मात्र, अशी वेळ येते की, त्यावेळी याचा परिणाम थेट संसारावर पडायला लागतो. पत्नीला पतीच्या विवाहबाह्य संबंधाची कुणकुण लागते. तेव्हापासून निट असलेल्या संसाराचा गाडा रूळावरून खाली उतरायला लागतो. परिणामतः घटस्फोट किंवा कौटुंबिक हिंचारापर्यंत विवाहबाह्य संबंध पोहोचतात क्षणिक सुखासाठी विवाहबाह्य संबंधामुळे अनेकांचे वैवाहिक जीवन उद्‌ध्वस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. परस्त्री ही सुखी संसाराच्या मध्ये आल्याने रायगड जिल्ह्यातील दहिवली येथील संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर ठेपला आहे.रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दहीवली येथे व्यवसायाने विधी तज्ञ असलेली निलम उमेश चौधरी (वय २९ वर्ष, व्यवसाय वकील, रा विनायक अपार्टमेन्ट प्लॅट नं.३०२ सुयोगनगर दहीवली, ता. कर्जत, जि. रायगड मुळ रा. देवपाडा जामसंग, ता. कर्जत, जि. रायगड) हीचा १४ ऑक्टोंबर २०१३ रोजी उमेश महादु चौधरी,( वय ३६ वर्ष रा ललानी रोड ता कर्जत जि रायगड मुळ रा पोखरकरवाडी कशेळे ता कर्जत जि रायगड ) यांच्याशी प्रेमविवाह झाला होता.या विवाहितांना एक मुलगी देखील आहे. प्रेम विवाहाची सुरवातीची सात वर्षे ही सुख समृध्दीत गेली.
मात्र नंतर या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागल्यासारखे झाले.
या दाम्पत्यांमध्ये परस्त्री आल्याने भांडणे होऊ लागली. परस्त्री आपली मैत्रीण आहे आणि तीदेखील याच घरात राहणार असे पतीने सांगितले. तर, त्या परस्रीला घरात ठेवण्याला विवाहित पत्नीने विरोध केला असता पती उमेश चौधरी यांनी नीलम हिस जेवण बनवता येत नाही, शिळं जेवण देते, मी तुझ्या सोबत राहणार नाही, तुला नांदवणार नाही, असे घालुन पाडुन बोलुन शिवीगाळ करून हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच तिच्या वडीलांकडुन घर घेण्यासाठी ४ ते ५ लाख रूपये घेवुन ये, असा तगादा नीलम हिच्या पाठी लावला. नीलम हिच्या वडिलांनी घर घेण्यासाठी चार लाख पन्नास हजार रुपये दिले होते. असे असताना देखील पती उमेश हा नेहमी पत्नी नीलम हिस सांगायचा की, मी तुला या घरात राहु देणार नाही. तुझ्या आई वडीलांनी मला घर घेण्यासाठी कमी पैसे दिले आहेत.
असे बोलुन निलम व त्यांची मुलगी यांना घाणेरडया भाषेत शिवीगाळ करून हाताबुक्यांनी मारहाण करून, शारीरीक व मानसीक छळ केला आहे.याबाबत नीलम उमेश चौधरी हीने कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर कर्जत पोलीस ठाणे येथे गु.रजि.नं.०६/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ८५, ११५(२),३५२,३५१(२) (३).ग नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक गरड यांच्या मार्गदर्शनाखाली महीला पोलिस नाईक घोलप या करीत आहेत.पती किंवा पत्नी घरी नसल्याची संधी साधून एकमेकांच्या घरी जाऊन भेटीपर्यंतचा हा प्रवास शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यापर्यंत पोहोचत आहेत. सुरुवातील कुणालाही प्रेमसंबंधाची कुणकुणही लागू न देण्याची खबरदारी महिला व पुरुष घेत असतो. मात्र, अशी वेळ येते की, त्यावेळी याचा परिणाम थेट संसारावर पडायला लागतो. पत्नीला पतीच्या विवाहबाह्य संबंधाची कुणकुण लागते. तेव्हापासून निट असलेल्या संसाराचा गाडा रूळावरून खाली उतरायला लागतो. परिणामतः घटस्फोट किंवा कौटुंबिक हिंचारापर्यंत विवाहबाह्य संबंध पोहोचतात
  • Related Posts

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात…

    महसूल अधिकारी यांच्याकडून कढोली व धानोरा हद्द बंद परंतु रवंजे सुकेश्वर या ठिकाणाहून वाळू उपसा जोरात… एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे वाळू माफियांचा धुमाकूळ, नुकताच धानोरा व कढोली या ठिकाणी महसूल…

    शेतजमिनीच्याा वानदातू ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला..

    शेतजमिनीच्याा वानदातू वयोवृध्द महिलेस अमानुष मारहाण ७० वर्षीय वयोवृध्द महिलेस मारहाण करून पाय मोडला; न्यायासाठी वृद्धेची प्रशासनाकडे आर्त हाक! कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तरीही कारवाईस विलंब? ‘जिवंतपणी न्याय मिळणार…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.