दुहेरी निष्ठा : राजकीय प्रवासातील असंतुलित विचारधारा..

दुहेरी निष्ठा : राजकीय प्रवासातील असंतुलित विचारधारा..

राजकारणात निष्ठा ही फक्त शब्दांची जुळवाजुळव नसते; ती प्रत्येक कार्यकर्त्याच्या अस्तित्वाचा पाया असते. मनात संभ्रम निर्माण झाला, परिस्थिती दोलायमान झाली आणि स्वतःच्या नेत्यावरचा विश्वास ढळू लागला की, ‘दुहेरी निष्ठा’ नावाचा धोकादायक विचार जन्म घेतो. अशा वेळी कार्यकर्त्याचा मार्ग गोंधळात पडतो, भूमिका कमकुवत होते आणि प्रवासाचा अर्थही हरवतो.

एखाद्या पक्षात काम करणे म्हणजे ध्वज फडकवण्यापेक्षा खूप मोठं कार्य असतं. सुरुवातीपासून पक्षाने आपल्यावर दाखवलेला विश्वास, दिलेली संधी, मिळवून दिलेली ओळख आणि मान–पद हे केवळ पदकं नाहीत, तर आयुष्यभराची देणगी असते.

ज्या पक्षाने आपल्याला नाव दिलं, पद दिलं, व्यासपीठ दिलं; त्या पक्षाला आणि त्या पक्षाच्या नेत्याला आपण किती लवकर विसरतो याचाही गंभीर विचार करायला हवा. कृतघ्नतेची ही प्रवृत्तीच दुहेरी निष्ठेची सुरुवात बनते आणि कार्यकर्त्याची खरी ओळख धूसर करते.

निवडणुका तर येतात–जातात; पक्षात येणं-जाणं चालू राहतात. पण पक्षनिष्ठा हे राजकीय आयुष्याचं अदृश्य कवच असतं. पद मिळालं तर स्वीकारायचं, पद गेलं तर नाराजी न दाखवता काम करत राहायचं हीच खरी बांधिलकी. म्हणूनच, संघटनेप्रती निष्ठा ठेवणारा कार्यकर्ता कितीही कठीण परिस्थिती आली तरी दिशाहीन होत नाही.

आजच्या राजकारणात स्वार्थाचा जाळ अधिक घनदाट होत चालला आहे. क्षणिक फायद्यासाठी दोन ठिकाणी पाय ठेवण्याचा मोह कार्यकर्त्यांना भुरळ घालतो.

पण इतिहास नेहमी निष्ठावंतांचेच स्मरण ठेवतो, कारण विचारांशी प्रामाणिक राहणाऱ्यांचीच ओळख टिकून राहते. प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःला प्रश्न विचारायलाच हवा मी पक्षाचा मान वाढवत आहे का, की फक्त परिस्थितीनुसार निष्ठा बदलत चाललो आहे ?

उत्तर स्पष्ट असेल, तर प्रवासही स्थिर आणि सन्मानाने पुढे जातो.  ॲड जमील देशपांडे

  • Related Posts

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान. धरणगाव तालुका प्रतिनिधि -‌ राजु बाविस्कर, महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद तर्फे तात्यासाहेब ज्योतिबा फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2025-…

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू.. प्रतिनिधी | जामठी राज्यातील ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना घरकुल मिळवून देणाऱ्या विविध आवास योजनांची तांत्रिक अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांनी प्रलंबित…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..