बिनशेतीसाठी होत असलेल्या वृक्षतोडीचा कादिर खान हाजी जोरावर खान यांचा पत्रकार परिषदेत खुलासा..

बिनशेतीसाठी होत असलेल्या वृक्षतोडीचा कादिर खान हाजी जोरावर खान यांचा पत्रकार परिषदेत खुलासा..

भडगाव (वा): भडगाव शहरातील टोणगाव शिवारात गट क्रमांक ५६१/१ मध्ये सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या प्रकरणाने चांगलाच वाद पेटवला आहे. या संदर्भात भडगाव शहरातील उद्योजक कादिर खान हाजी जोरावर खान यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या भूमिकेचा सविस्तर खुलासा केला. ही पत्रकार परिषद आज दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता, भडगाव शहरातील सुंदरबन फार्म येथे आयोजित करण्यात आली होती.


कादिर खान यांनी सांगितले की, “टोणगाव शिवारात गट क्रमांक ५६१/१ या ठिकाणी होत असलेली वृक्षतोड ही अधिकृत परवानगी घेऊनच केली असुन आम्ही भडगाव नगरपरिषद तसेच वन विभागाकडून सर्व आवश्यक त्या परवानग्या घेतल्या आहेत.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “तक्रारदार सलीम सखावत खान यांनी भडगाव तहसीलदार यांना लेखी दिलेल्या तक्रारीमध्ये २०० ते ३०० झाडे तोडल्याचा आरोप केला असला तरी, प्रत्यक्ष ठिकाणी फक्त १४ ते १५ झाडे होती. याचा पंचनामा वनपरिक्षेत्र अधिकारी सरिता पाटील, वनपाल नंदू पाटील, तसेच नगरपरिषद मुख्याधिकारी व त्यांच्या पथकाने प्रत्यक्ष स्थळी उपस्थित राहून झाडांची पाहणी व पंचनामा केला आहे. तसेच लाकूड वाहतुकीसाठी वाहतूक परवाना देखील आम्ही संबंधित कार्यालयाकडून घेतला आहे.” असा दावा कादिर खान हाजी जोरावर खान यांनी केला.

या प्रकरणात तक्रारदाराने कोणतीही योग्य चौकशी न करता, मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने भडगाव तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला असुन या पत्रकार परिषदेत हाजी जाकीर कुरेशी आणि बब्बू सेठ उपस्थित होते. “अश्या खोट्या व दिशाभूल करणाऱ्या तक्रारी करणाऱ्यांवर प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्यात यावी असे कादिर खान यांनी सांगितले.

  • Related Posts

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान. धरणगाव तालुका प्रतिनिधि -‌ राजु बाविस्कर, महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद तर्फे तात्यासाहेब ज्योतिबा फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2025-…

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू.. प्रतिनिधी | जामठी राज्यातील ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना घरकुल मिळवून देणाऱ्या विविध आवास योजनांची तांत्रिक अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांनी प्रलंबित…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..